कुणालाही मुख्यमंत्री करा पण… दीपक केसरकर यांचं विधान काय?

कुणालाही मुख्यमंत्री करा पण… दीपक केसरकर यांचं विधान काय?

शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्रीपदावरून भुवया उंचावणारं विधान केलं आहे. फिरता मुख्यमंत्री कधी ऐकलं नाही. फिरता चषक ऐकला आहे. कुणालाही मुख्यमंत्री करा. पण महाराष्ट्राला स्टेबल मुख्यमंत्री हवा आहे, असं विधान दीपक केसरकर यांनी केलं आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मात्र, या विधानानंतर त्यांनी लगेचच सध्यातरी मुख्यमंत्री पदाचा पहिला पर्याय एकनाथ शिंदे हेच आहेत. एकनाथ शिंदे हे कलेक्टिव्ह नेतृत्व आहे, असं दीपक केसरकर म्हणाले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागा वाटपावर भाष्य केलं होतं. त्यावर दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आजही भाजपकडे 100 हून अधिक आमदार आहेत. तरीही मोठा भाऊ, लहान भाऊ ही भावना कुणाच्या मनात नाहीये. भाजपच मोठा भाऊ आहे. पण मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेच राहतील. जागा वाटपात भाजप मोठा भाऊ ठरेल यात काही शंका नाही, असं दीपक केसरकर यांनी स्पष्ट केलं. बाळासाहेब असताना एक सूत्र होतं. दिल्ली भाजपने सांभाळावी आणि महाराष्ट्र शिवसेनेने, असंही त्यांनी सांगितलं.

भूकंप होणार नाही

महाविकास आघाडीत अस्वस्थता असल्याचं विधान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. त्यावरही केसरकर यांनी भाष्य केलंय. महाविकास आघाडीत तर अस्वस्थता आहेच. मुख्यमंत्रीपदावरून त्यांच्यात अस्वस्थता आहे. म्हणूनच महाविकास आघाडीवाले मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करत नाहीयेत. त्यांच्यासोबत आता फतवे काढणारे आहेत. तर आमच्यासोबत सच्चे शिवसैनिक आहेत, असं सांगतानाच महायुतीत कोणताही भूकंप होणार नाही. आम्ही विचारधारेच्या मुद्द्यावर सोबत आलो आहोत, असंही त्यांनी सांगितलं.

राज ठाकरे यांना माहिती देऊ

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेवर टीका केली होती. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. महिलांनी छोटे छोटे व्यवसाय सुरू केले आहेत. आम्ही सर्व माहिती राज ठाकरे यांना देऊ आणि त्यांच्या गैरसमज दूर केला जाईल, असं ते म्हणाले.

भेटीही रद्द केल्या

दीपक केसरकर यांनी धर्मवीर सिनेमावरून उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केली. पाच पाच तास आमदारांना उभ करायचं, साहित्यिकांना बाहेर उभ करायचं, हा अपमान महाराष्ट्राला सहन होत नाही. सिनेमातून हे सत्य बाहेर आलं आहे. मला देखील बाहेर उभ राहावं लागलं आहे. भेटीसाठी बोलावलं असताना भेटही रद्द केल्याचे प्रकार घडले आहेत, असं दीपक केसरकर यांनी सांगितलं.

आम्हीही निवडून आलो असतो

सिनेट निवडणुकीत युवा सेनेला दहा पैकी दहा जागा मिळाल्या आहेत. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. आम्ही सिनेटच्या निवडणुकीत पडलो नाही. आम्हीही मेंबर केले असते तर आम्ही पण निवडून आलो असतो, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

EVM नव्हतं म्हणूनच ABVP चा सुफडासाफ’, संजय राऊत यांची बोचरी टीका EVM नव्हतं म्हणूनच ABVP चा सुफडासाफ’, संजय राऊत यांची बोचरी टीका
बहुचर्चित आणि वादात राहिलेल्या मुंबई विद्यापीठ सिनेटच्या विजयानंतर मातोश्रीवर जल्लोष झाला, घोषणाबाजी केली. दरम्यान, पदवीधर निवडणुकीनंतर पदवीधरांनी सरकारला धडा शिकवल्याचा...
या देशात याकूब मेमनच्या दफनासाठी जागा मिळते, पण अक्षयला… आरोपीच्या वकिलाची खदखद काय?
शबाना आझमी यांच्या ‘त्या’ विधानाने मोठ्या वादाला तोंड?, थेट म्हणाल्या, भारतात कायमच महिलांना…
हरयाणात बेकायदेशीर फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट, तीन जणांचा मृत्यू
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, शरद पवारांनी भाजप आमदाराला सुनावले
Ratnagiri News – विधानसभा निवडणूक कधीही होवो दापोलीत शिवसेनाच, माजी आमदार संजय कदम यांना ठाम विश्वास
Photo – मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत दणदणीत विजयानंतर मातोश्री येथे जल्लोष