maharashtra assembly election date 2024: महाराष्ट्रात निवडणुका एका टप्प्यात होणार का? निवडणूक आयोगाने स्पष्टच सांगितले

maharashtra assembly election date 2024: महाराष्ट्रात निवडणुका एका टप्प्यात होणार का? निवडणूक आयोगाने स्पष्टच सांगितले

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक जाहीर करण्यासाठी निवडणूक आयोगाने शनिवारी पत्रकार परिषद घेतली. निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि इतर दोन निवडणूक आयुक्तांच्या उपस्थितीत निवडणुकीची घोषणा करण्यात आली. निवडणूक जाहीर करण्यापूर्वी आयोगाने गेल्या दोन दिवसांपासून ११ राजकीय पक्षांशी चर्चा केली. या चर्चेत सण उत्सव पाहून निवडणुका घोषित करा, आठवड्याच्या मध्यामध्ये म्हणजे शनिवार, रविवार सोडून मतदान घ्यावे, असे राजकीय पक्षांनी म्हटले. फेक न्यूज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतात, त्यावर नियंत्रणाची मागणी राजकीय पक्षांनी केली, असे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले. या सर्व गोष्टींवर आयोगाने विचार केला आहे. निवडणुका एका टप्प्यात होणार की दोन टप्प्यात होणार हे आम्ही लवकरच स्पष्ट करु, असे निवडणूक आयुक्तांनी यावेळी सांगितले.

पुणे, कल्याणमध्ये कमी मतदान

महाराष्ट्रात ९.५९ कोटी मतदार आहे. महाराष्ट्रात सर्व व्यक्तीला मतदानाचा अधिकार बजवता यावा, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. गडचिरोली जिल्ह्यात गरज पडल्यास हेलिकॉप्टरचा वापर करण्यात येणार आहे. राज्यात काही ठिकाणी कमी मतदान होते. त्या ठिकाणी जनजागृती करण्यात येणार आहे. पुणे, कल्याण, कुलाबा या ठिकाणी कमी मतदान होते. परंतु गडचिरोलीत जास्त मतदान होते. कमी मतदान असलेल्या या ठिकाणी मतदान वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. कुलाबामध्ये ४० टक्के, कल्याणमध्ये ४४ टक्के तर कुर्ला येथे ४१ टक्के मतदान मागील निवडणुकीत झाले होते. जम्मू काश्मीरशी तुलना केली तर महाराष्ट्रातील या ठिकाणी कमी मतदान होते. काश्मीरमध्ये दोडामध्ये ७२ टक्के, पुंछमध्ये ७४ टक्के. बस्तरमध्ये ६० टक्के आणि महाराष्ट्रातील गडचिरोली ७३ टक्के मतदान झाले. गडचिरोलीमध्ये एवढे मतदान होत असेल तर कुलाबा, कल्याण आणि पुण्यातही एवढे मतदान होऊ शकतो. निवडणूक दरम्यान तंत्रज्ञानाचा वापर या निवडणुकीसाठी करण्यात येणार आहे, असे निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी म्हटले.

या लोकांना गुन्ह्यांची माहिती द्यावी लागणार

ज्या नेत्यांवर गुन्हे दाखल आहेत त्यांना स्थानिक वृत्तपत्र आणि चॅनलमध्ये तीनदा जाहिरात द्यावी लागणार आहे. त्या जाहिरातीत त्यांच्यावर कोणते गुन्हे दाखल आहेत, ते सांगावे लागणार आहे. तसेच राजकिय पक्षांनाही हा नियम लागू होणार आहे. त्यांना गुन्हे दाखल असलेल्या नेत्याला उमेदवारी का दिली ते सांगावे लागणार आहे.

 

  • राज्यात विधानसभेच्या जागा २८८ जागा
  • एसटी विधानसभा मतदार संघ – २५
  • एससी विधानसभा मतदार संघ – २९

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कुणालाही मुख्यमंत्री करा पण… दीपक केसरकर यांचं विधान काय? कुणालाही मुख्यमंत्री करा पण… दीपक केसरकर यांचं विधान काय?
शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्रीपदावरून भुवया उंचावणारं विधान केलं आहे. फिरता मुख्यमंत्री कधी ऐकलं नाही. फिरता चषक ऐकला...
काँग्रेसच्या काळातील योजना खड्ड्यात घालण्यासाठी होत्या का?; राज ठाकरे यांना कुणी केला सवाल?
धनगर आरक्षणाला विरोध करण्यासाठी सत्ताधारी आमदारच आंदोलन करणार; सरकारची डोकेदुखी वाढली
‘कोई मिल गया’ सिनेमानंतर रजत बेदीने अचानक का सोडलं बॉलिवूड आणि देश?
मौनी रॉय हिचा लाल बिकिनीमध्ये जलवा, अभिनेत्री थेट मालदीवमध्ये आणि…
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या निर्मात्यावर भिडेच्या लेकीचा गंभीर आरोप
सैफ अली खान याचा पहिल्यांदाच करीना कपूर हिच्याबद्दल ‘तो’ मोठा खुलासा, अभिनेता थेट म्हणाला…