कौटुंबिक वादातून विवाहितेला हातपाय बांधून बाथरुममध्ये कोंडले, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

कौटुंबिक वादातून विवाहितेला हातपाय बांधून बाथरुममध्ये कोंडले, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

कौटुंबिक वादातून विवाहितेला चाकूचा धाक दाखवून तिचे हातपाय नायलॉन दोरीने बांधून बाथरुममध्ये कोंडल्याची घटना देवगडमध्ये घडली. पीडित विवाहितेने घटनेची माहिती पोलिसांच्या 112 नंबरवर दिल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत विवाहितेची सुटका केली. याप्रकरणी पाच जणांविरोधात देवगड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुजारेवाडी येथे मंगळवारी पहाटे ही घटना घडली.

स्मिता गणेश घाडी (60), अमिता अनिल बाणे (62), दिव्या गणेश घाडी (32), अनिल गणपत बाणे (63), सुनीता सूर्यकांत बाणे (64) या संशयितांविरुद्ध देवगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विवाहिता ही मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घरानजीक असलेल्या शौचालयात गेली होती. यावेळी संशयित स्मिता घाडी, अमिता बाणे, दिव्या घाडी, अनिल बाणे, सुनीता बाणे यांनी त्यांना चाकूचा धाक दाखवला. त्यानंतर तिचे हातपाय नायलॉन दोरीने घट्ट बांधून बाथरुमकडे ओढत नेले. त्यानंतर तिला बाथरुममध्ये कोंडून बाहेरून लॉक लावून बंदिस्त केले.

या घटनेदरम्यान पीडित विवाहितेकडे मोबाईल होता. तिने पोलिसांच्या 112 क्रमांकावर फोन करून घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर देवगड पोलीस स्थानकाचे कॉन्स्टेबल नीलेश पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी जात पीडित विवाहितेची सुटका केली. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडला असल्याचे पीडित विवाहितेने देवगड पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेचा तपास महिला पोलीस हवालदार अमृता बोराडे करीत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबईत पावसाचं रौद्ररुप, शाळांना सुट्टी जाहीर, प्रशासनाची नेमकी काय-काय तयारी? मुंबईत पावसाचं रौद्ररुप, शाळांना सुट्टी जाहीर, प्रशासनाची नेमकी काय-काय तयारी?
महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. जवळपास 15 ते 20 दिवसांच्या मोठ्या ब्रेकनंतर पावसाने पुन्हा एकदा महाराष्ट्राची...
मुंबईत मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतुकीला फटका, मध्य आणि पश्चिम रेल्वे विस्कळीत
मुंबईत BMC कडून हायअलर्ट जारी, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
महाराष्ट्र : राजकीय आखाड्यात तीन बापलेकांची कुस्ती रंगणार ?
Mumbai rain : मुंबईत मुसळधार पावसामुळे दिल्ली-मुंबई विमान हैदराबादकडे वळवलं
पवार कुटुंब एकत्र येणार का ? अजितदादा म्हणाले की,’पुढचं कोणी पाहीलंय ? आम्ही काही…
बलात्काराचा आरोप असलेल्या भाजप पदाधिकाऱ्याचे काय? सोशल मीडियावर नेटकऱ्यांचा प्रश्न