Gen Z ला नोकरीवर घेण्यास कंपन्यांचा नकार, महत्त्वाचे कारण आले समोर

Gen Z ला नोकरीवर घेण्यास कंपन्यांचा नकार, महत्त्वाचे कारण आले समोर

जगभरात अनेक कंपन्या Gen Z कर्मचाऱ्यांना नोकरीवर घेण्यास नकार देत आहेत. इतकंच नाही तर जे कर्मचारी Gen Z आहेत त्यांना कामावरून काढून टाकत आहेत. या पिढीच्या तरुण तरुणींमध्ये प्रोफेशनलिझ्म नाही असे कारण कंपन्यांनी दिले आहे.

Gen Z बाबत एक सर्वेक्षण केले गेले. त्यात एक गोष्ट समोर आली की अनेक मोठ्या कंपन्या Gen Z तरुण तरुणींना कामावर घेत नाहीत,तसेच आहे त्या Gen Z कर्मचाऱ्यांना नारळ देत आहेत. या कर्मचाऱ्यांची कम्युनिकेशन स्किल चांगले नाही, तसेच कामाच्या बाबतीत या कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा असतो असेही काहींनी म्हटले आहे.

Intelegent.com या साईटने 10 मोठ्या कंपन्यांशी चर्चा केली. त्यात 10 पैकी सात कंपन्यांनी सांगितले की नुकतंच कॉलेजमधून बाहेर पडलेल्या तरुणांना नोकरी देण्याबाबत कंपनी दहा वेळा विचार करते. या सर्वेक्षणात एक हजार कपन्यांच्या प्रतिनिधींनी सहभाग नोंवला होता. न्युजवीकने याबाबत एक अहवाल सादर केला होता.

कॉलेजमध्ये जे शिकवले गेले आणि प्रत्यक्षात करावे लागणारे काम यात तफावत असतो, त्यामुळे या पिढीच्या तरुण तरुणींना काम करताना अडचणी येतात. या पिढीतल्या तरुणांना कामावर घेण्यासाठी कंपन्या कचरतात कारण हे तरुणी ऑफिसच्या वातावरणत फिट बसत नाहीत. इतकंच नाही तर कामाची जबाबादारी घेण्यात हे तरुण कमी पडतात.

या तरुणांना कॉलेजमधून थेअरॉटिकल नॉलेज तर मिळतं. पण व्यावहारिक ज्ञान, वास्तवातला फरक आणि प्रोफेशनलिझम कमी पडतो. या सर्वेक्षणात सामील झालेल्या 75 टक्के कंपन्यांनी म्हटले की नुकतंच कॉलेजमधून पासआऊट झालेल्या तरुणांचे काम समाधानकारक नाही. या तरुणांमध्ये कामासाठी प्रेरणा नसते. तसेच 39 कंपन्यांना वाटले की या पिढीमध्ये कम्युनिकेशन स्किल्सही कमी आहेत. तर 46 टक्के कंपन्यांनी या पिढीत प्रोफेललिझम कमी असल्याचे म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबईत पावसाचं रौद्ररुप, शाळांना सुट्टी जाहीर, प्रशासनाची नेमकी काय-काय तयारी? मुंबईत पावसाचं रौद्ररुप, शाळांना सुट्टी जाहीर, प्रशासनाची नेमकी काय-काय तयारी?
महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. जवळपास 15 ते 20 दिवसांच्या मोठ्या ब्रेकनंतर पावसाने पुन्हा एकदा महाराष्ट्राची...
मुंबईत मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतुकीला फटका, मध्य आणि पश्चिम रेल्वे विस्कळीत
मुंबईत BMC कडून हायअलर्ट जारी, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
महाराष्ट्र : राजकीय आखाड्यात तीन बापलेकांची कुस्ती रंगणार ?
Mumbai rain : मुंबईत मुसळधार पावसामुळे दिल्ली-मुंबई विमान हैदराबादकडे वळवलं
पवार कुटुंब एकत्र येणार का ? अजितदादा म्हणाले की,’पुढचं कोणी पाहीलंय ? आम्ही काही…
बलात्काराचा आरोप असलेल्या भाजप पदाधिकाऱ्याचे काय? सोशल मीडियावर नेटकऱ्यांचा प्रश्न