हल्ली दर महिन्याला घटस्फोट..; तरुण पिढीबद्दल काय म्हणाल्या आशा भोसले?

हल्ली दर महिन्याला घटस्फोट..; तरुण पिढीबद्दल काय म्हणाल्या आशा भोसले?

दिग्गज पार्श्वगायिका आशा भोसले या गेल्या अनेक वर्षांपासून कलाविश्वात कार्यरत आहेत. शेकडो कलाकारांना त्यांनी आपला आवाज दिला आहे. नुकत्याच एका कार्यक्रमात त्या तरुण पिढीच्या दृष्टीकोनाबद्दल मोकळेपणे व्यक्त झाल्या. लग्नाबद्दल या पिढीचा दृष्टीकोनच वेगळा असून ते टिकवण्यासाठी पुरेसे प्रयत्न न करताच घटस्फोटाचा निर्णय घेण्याची घाई करतात, असं त्या म्हणाल्या. अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांच्यासोबत साधलेल्या संवादादरम्यान त्यांनी हा प्रश्न विचारला. “आजकालची तरुण दाम्पत्य इतक्या घाईने घटस्फोटाचा निर्णय का घेतात”, असा सवाल त्यांनी रविशंकर यांना केला. यावेळी आशा भोसले यांनी त्यांचाही अनुभव सांगितला. पतीसोबत जेव्हा कधी भांडणं व्हायची तेव्हा काही दिवस मुलांना घेऊन मी आईकडे राहायला जायची, असं त्यांनी सांगितलं.

“भांडणानंतर मी मुलांना घेऊन माहेरी निघून जायची. पण मी कधीच पतीला घटस्फोट देण्याचा विचार केला नाही. पण हल्लीचे कपल्स दर महिन्याला एकमेकांना घटस्फोटाची कागदपत्रं पाठवत असल्याचं मी ऐकलंय. गुरुदेव, हे असं का होतंय”, असं त्या रविशंकर यांना विचारतात. त्यावर उत्तर देताना रविशंकर म्हणतात की आजच्या काळात फार कमी लोकांमध्ये आशा भोसलेंइतकी चिकाटी आणि संयम असतो. “तुम्ही गाणी गात राहिलात आणि प्रत्येकाला खुश केलंत. तुमचा देवावरही विश्वास आहे आणि संकटांना सामोरं जाण्यासाठीची ताकद, त्यांना सहन करण्याचा संयमही तुमच्यात आहे. हल्ली लोकांमधील सहन करण्याची ताकद कमी होत चालली आहे”, असंही ते पुढे म्हणाले.

“मी फिल्म इंडस्ट्रीत इतकी वर्षं काम केलंय आणि अनेक लोकांना मी पाहिलंय पण पूर्वीची लोकं आताच्या पिढीसारखी टोकाची भूमिका पटापट घेत नव्हती. मला असं वाटतं की आताच्या पिढीच्या जोड्यांमधील प्रेम फार लवकर संपतं आणि ते एकमेकांना लगेच कंटाळतात. कदाचित हे एक मुख्य कारण असू शकतं”, असं आशा भोसले पुढे म्हणतात. तर रविशंकरसुद्धा सहमती दर्शवतात.

आशा भोसले या 16 वर्षांच्या असताना गणपतराव भोसले यांच्यासोबत पळून गेल्या होत्या. 31 वर्षीय गणपतराव हे आशा यांच्या मोठ्या बहिणीचे सेक्रेटरी होते. कुटुंबीयांच्या मर्जीविरोधात जाऊन दोघांनी लग्न केलं होतं. या दोघांना तीन मुलं आहेत. 1960 मध्ये ते विभक्त झाले. त्यानंतर आशा भोसलेंनी संगीत दिग्दर्शक आणि अभिनेते आरडी बर्मन यांच्या 1980 मध्ये दुसरं लग्न केलं. 1994 मध्ये आरडी बर्मन यांचं निधन झालं होतं.

“हल्ली महिलांना बाळ जन्माला घालणं म्हणजे एक ओझं वाटतं. मी वयाच्या दहाव्या वर्षापासून गायनाला सुरुवात केली होती. मला तीन मुलं आहेत आणि तिघांचा मी सांभाळ केला. तिघांची लग्न पार पडली आणि आता मला नातवंडंही आहेत. मी यशस्वीपणे माझ्या सर्व जबाबदाऱ्या पार पडल्या, तेसुद्धा पतीशिवाय. दिवसरात्र काम करून, व्यग्र वेळापत्रक असतानाही मी हे सर्व केलं”, असं आशा भोसले यांनी सांगितलं. हल्ली कुटुंब आणि करिअर या दोन्ही जबाबदाऱ्या एकत्र का सांभाळल्या जात नाहीत, असाही सवाल त्यांनी केला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Akshay Shinde Encounter : दोन्ही हातात बेड्या असताना… अक्षय शिंदे एन्काऊंटरवरून सुषमा अंधारे यांनी वेधलं त्या मुद्द्याकडे लक्ष; पोलिसांनाच विचारला जाब Akshay Shinde Encounter : दोन्ही हातात बेड्या असताना… अक्षय शिंदे एन्काऊंटरवरून सुषमा अंधारे यांनी वेधलं त्या मुद्द्याकडे लक्ष; पोलिसांनाच विचारला जाब
बदलापूर मधील शाळेतील चिमुकल्या मुलींवर अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिस एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाल्यानंतर विरोधकांकडून याप्रकरणी अनेक प्रश्न उपस्थित...
‘तुम्हाला पटेल किंवा..’ अरबाजसाठी हेमांगी कवीची पोस्ट, अभिजीत म्हणाला ‘बाज नहीं आओगी तुम’
राज ठाकरे सलमान खानच्या भेटीला; काय आहे कारण?
ऐश्वर्या राय – अभिषेक बच्चनचं असं आहे नातं! ‘हा’ व्हिडीओ पुरावा, असं असताना का होतेय घटस्फोटाची चर्चा?
प्राजक्ता माळीने धरला ‘मदनमंजिरी’ गाण्यावर ठेका, अभिनेत्रीच्या लावणीवर चाहते फिदा
आता रेल्वेप्रवास होणार सुपरफास्ट! नगर – मनमाड रेल्वेमार्गासाठी पढेगाव ते राहुरी चाचणी यशस्वी
…म्हणून शिंदे प्रकरण मुळापासून संपवलं! संजय राऊत यांचा गंभीर आरोप