आमचं सरकार आल्यावर मुंबई-गोवा महामार्गाची चौकशी लावू; शरद पवार यांचे प्रतिपादन

आमचं सरकार आल्यावर मुंबई-गोवा महामार्गाची चौकशी लावू; शरद पवार यांचे प्रतिपादन

मुंबई-गोवा महामार्गावरील रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार झाला आहे. दोन महिन्यानंतर आमचे सरकार आल्यानंतर आम्ही रस्त्याच्या कामांची चौकशी लावू आणि जनतेला चांगले रस्ते देऊ, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.

चिपळूण येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शरद पवार यांनी कराडवरून चिपळूणला येताना आलेला खराब रस्त्याचा अनुभव सांगितला. ते म्हणाले की, मी काल कराड मार्गे चिपळूणला आलो अतिशय खराब रस्त्याचा अनुभव घेतला. रस्त्यावर अनेक खड्डे पडले आहेत. मुंबई-गोवा महामार्गाची अवस्थाही तीच आहे. हा सरकारचा बेफिकिरपणा आहे. चिपळूण येथे कोसळलेल्या ओवरब्रिजचा उल्लेखही त्यांनी यावेळी केला. पुण्यात काही दिवसांपूर्वी ट्रक खड्ड्यात गेल्याचे उदाहरण देताना शरद पवार यांनी रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केला.

महाविकास आघाडीचे जागावाटप लवकर होईल पण त्यापूर्वी अन्य काही पक्षांना महाविकास आघाडीत समाविष्ट करण्याचा माझा विचार आहे. कम्युनिस्टपक्ष, शेकाप सारख्या पक्षांना महाविकास आघाडीत घेण्याचा विचार सुरू आहे, असे शरद पवार म्हणाले. महाराष्ट्रात एक चांगला प्रगतशील पर्याय उभा करण्याचा आमचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रात चांगले सरकार आम्ही देऊ. जागावाटप केल्यानंतरच उमेदवार जाहिर केला जाईल. चिपळूणची जागा आम्हाला मिळाल्यास आम्ही आमचा उमेदवार जाहिर करू, असे त्यांनी स्पष्ट सांगितले.

लाडक्या बहिणी वरून सुरू असलेल्या श्रेयवादावर शरद पवार म्हणाले की, योजना ही सरकारच्या पैशातून असते, कोण खिशातून पैसे देत नाही. मी 24 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात होतो. पण आम्ही कधी असे केले नाही. महाशक्ती या तिसऱ्या आघाडी बाबत शरद पवार म्हणाले की, लोकशाहीत सर्वांना निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. यावेळी माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, माजी आमदार रमेश कदम, जिल्हाध्यक्ष सुरेश बने, सरचिटणीस प्रशांत यादव उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर, सुषमा अंधारेंनी व्यक्त केली मोठी शंका बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर, सुषमा अंधारेंनी व्यक्त केली मोठी शंका
बदलापूरमधील नामांकित शाळेतील चिमुकलींवर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अक्षय शिंदे याचा मृत्यू...
स्वरा भास्कर हिचा हैराण करणारा खुलासा, म्हणाली, मला भीती होती फहाद अहमद…
Nanded News – मराठा आंदोलकांवर पोलिसांचा लाठीमार, पाच जण जखमी
मराठी माणसाला एक रुपयाचा बिझनेस देणार नाही, असे म्हणणारा टीसी आशिष पांडेला रेल्वेने केले निलंबीत
इस्त्रायलने लेबनॉनवर रॉकेट डागले, 182 हून अधिक लोकांचा मृत्यू
ICC Women’s T20 World Cup 2024 – महिला विश्वचषकासाठी ICC ने जारी केले साँग, बोल आहेत…
Badlapur Sexual Assault : आरोपी अक्षय शिंदे याने स्वत:वर गोळी झाडली, प्रकृती गंभीर