ठाण्यातील जिल्हा परिषद शाळांना 25 सप्टेंबरला कुलूप; ग्रामीण भागातील हजारो शिक्षक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार

ठाण्यातील जिल्हा परिषद शाळांना 25 सप्टेंबरला कुलूप; ग्रामीण भागातील हजारो शिक्षक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार

पक्षफोड, विरोधकांच्या मागे यंत्रणांचा ससेमीरा लावून चोवीस तास राजकारण करणाऱ्या खोके सरकारमुळे राज्यातील शिक्षणाचा अक्षरशः बट्ट्याबोळ झाला आहे. चुकीच्या धोरणामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होऊन ग्रामीण भागातील ज्ञानमंदिरे ओस पडू लागली आहेत. मात्र असे असताना सरकार ढिम्म असल्याने आता शिक्षकांनीच त्रिस्तरीय आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे. यासाठी ठाण्यातील हजारो शिक्षक जिल्हा परिषद शाळांना २५ सप्टेंबर रोजी कुलूप ठोकून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहेत.

सरकारने शिक्षक संच मान्यता व कंत्राटी शिक्षक भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे ज्या जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांची पटसंख्या २० असेल अशा शाळांमध्ये एक कायम तर एक कंत्राटी शिक्षक नेमला जाणार आहे. मात्र या धोरणाने ग्रामीण शिक्षणाचा दर्जा वाढण्याऐवजी त्याचा अधिकच बट्ट्याबोळ उडणार आहे असा आरोप शिक्षक संघटनांसह पालकांनी केला आहे. दुर्गम भागात विद्यार्थ्यांची संख्या आजही अधिक आहे, परंतु त्यांच्याकडे आधार नोंदणी नसल्याने याचा फटका शिक्षकांची पदे भरताना बसणार असून या निर्णयालाच शिक्षक संघटनेने विरोध केला आहे. याकरिता संपूर्ण राज्यात त्रिस्तरीय आंदोलन केले जाणार आहे. पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात सर्वच शाळांमधील शिक्षक काळ्या फिती लावून काम करत असतानाच प्रशासनाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवरूनदेखील एकाच वेळी बाहेर पडले आहेत. आता २५ सप्टेंबर रोजी तिसऱ्या टप्प्यात शाळांना टाळे ठोकून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत आंदोलन करणार आहेत अशी माहिती प्राथमिक शिक्षक समितीचे विनोद लुटे व शिक्षक सेनेचे अध्यक्ष प्रमोद पाटोळे यांनी दिली आहे.

गणवेश, पुस्तके वेळेत द्या !
शिक्षक संच मान्यता व कंत्राटी शिक्षक भरतीविरोधात आंदोलन करणाऱ्या शिक्षकांनी प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना वेळेत गणवेश व पुस्तके देण्यात यावीत अशी मागणी केली आहे. याबरोबरच दिलेल्या पुस्तकांमध्ये कोरी पाने न देता स्वतंत्र स्वाध्याय पुस्तिका द्यावी, शैक्षणिक व अशैक्षणिक कामांच्या शासन निर्णयात दुरुस्ती, शिक्षकांना मुख्यालयी निवासाची सक्ती रद्द करावी, आश्वासित प्रगती योजना लागू करावी, सर्व पदवीधर शिक्षकांना सरसकट वेतनश्रेणी, शालेय पोषण आहार योजना स्वतंत्र यंत्रणेकडे द्यावी तसेच विविध अभियान, उपक्रम, सप्ताह, बहि:शाल संस्थांच्या परीक्षा, वारंवार मागितली जाणारी ऑनलाइन माहिती यासारखी कामे थांबविण्यात यावीत अशा मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले जाणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

…तर प्रकाश आंबेडकर उपमुख्यमंत्री असते, रामदास आठवले यांनी थेट भावनेलाच घातला हात, रिपब्लिकन ऐक्याचं स्वप्न पूर्ण होणार का? …तर प्रकाश आंबेडकर उपमुख्यमंत्री असते, रामदास आठवले यांनी थेट भावनेलाच घातला हात, रिपब्लिकन ऐक्याचं स्वप्न पूर्ण होणार का?
रिपब्लिकन ऐक्य हे तर समाजाचं स्वप्न आहे. विविध गटा तटात विखुरलेल्या नेत्यांनी एक मोट बांधून निवडणुकीला सामोरं जावं अशी समाजाची...
सत्यपाल मलिक उद्धव ठाकरे यांच्या भेटीला; भाजपवर घणाघाती टीका करत म्हणाले, सरकार तर…
शूटिंग सुरू असताना सेटवर अत्यंत मोठा अपघात, अभिनेत्रीचा जळाला चेहरा, अंकिता लोखंडे धावली मदतीला आणि पुढे…
दहा वर्ष लहान पतीसोबत अभिनेत्रीने केला रोमान्स, लिपलॉक करताना आई वडिलांना बघताच मुलीने थेट…
श्रद्धा कपूरच्या कुटुंबातील लोकप्रिय अभिनेत्री दिसणार सलमान खानच्या शोमध्ये? मोठी अपडेट समोर
अरविंद केजरीवाल दिल्लीतील मुख्यमंत्री निवास लवकरच सोडणार; केंद्राकडे निवासस्थानाची मागणी
राज्यातूनच नाही, तर देशभरातून भाजपचा सफाया निश्चित; सत्यपाल मलिक यांचा भाजपवर हल्लाबोल