तिकडे हिंदुंवर अत्याचार होत असतील तर भारत-बांगलादेश सामना कशासाठी? आदित्य ठाकरेंचा भाजपसह BCCI ला सवाल

तिकडे हिंदुंवर अत्याचार होत असतील तर भारत-बांगलादेश सामना कशासाठी? आदित्य ठाकरेंचा भाजपसह BCCI ला सवाल

टीम इंडिया आणि बांगलादेशमधील कसोटी मालिकेला उद्यापासून (19 सप्टेंबर) सुरूवात होत आहे. कसोटी मालिका सुरू होण्याआधी वादात सापडली आहे. बांगलादेशमध्ये हिंदुंवर अत्याचार होत असल्याचं बातम्यांमधून समजत आहे. हिंदुवर अत्याचार तिकडे होत असतील तर भारत आणि बांगलादेश कसोटी सामने का घेतले जात आहेत? असा सवाल करत ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. पत्रकार परिषदेमध्ये आदित्य ठाकरे बोलत होते.

आदित्य ठाकरे काय म्हणाले?

भारत विरुद्ध बांगलादेश सिरीज सुरु होतेय. अनेकांनी मला फोन केले भाजपच्या नेत्यांनी फोन केले. हा खेळ झाला पाहिजे नको यात मला जायचं नाही पण मला परराष्ट्र मंत्रालयातुन माहिती हवीय की बांगलादेश मध्ये काय परिस्थिती होती हे सांगावं. व्हॉटसअप किंवा बातम्या अनेक पाहिल्या. हिंदुवर अत्याचार होतोय असं सर्वत्र दाखवलं जातंय. केंद्र सरकार भाजपचे, BCCI भाजपची, तीच BCCI देशात टेस्ट घेतायत. मग आता हिंदुत्व कुठे गेले? असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला.

भाजपचे नेते पण या संबंधित विचाराधीन आहेत कि आपण काय बोलायचं? परराष्ट्र मंत्रालयाकडून मला माहिती हवी आहे कि दोन महिन्यात परिस्थिती काय होती? परराष्ट्र मंत्रालयाकडून मला माहिती हवी आहे कि दोन महिन्यात परिस्थिती काय होती? मी भूमिका नाही तर परराष्ट्र मंत्रालयाकडून माहिती हवी आहे? खरच हिंदुवर अत्याचार तिकडे झाले आहेत का? याची माहिती द्यावी जर अत्याचार होत असतील तर सामने का घेतले जात आहेत? असा सवासही आदित्य ठाकरेंनी केला आहे.

निवडणूक घेण्याची हिंमत नाही आणि ते आता वन नेशन वन इलेक्शनची बात करतात. ते चार राज्यांची निवडणूक घेता येत नाही. 30 शहरांत निवडणुका घेत येत नाही. कपिल शर्मा कॉमेड शो सारखे हे झालंय. हरायचेच नाही म्हणून निवडणुका घ्यायचेच नाहीत त्यांना असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सिडकोच्या कोंढाणे धरणात मिंधे सरकारचा 1400 कोटींचा महाघोटाळा, मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतील मेघा इंजिनीअरिंग लाभार्थी सिडकोच्या कोंढाणे धरणात मिंधे सरकारचा 1400 कोटींचा महाघोटाळा, मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतील मेघा इंजिनीअरिंग लाभार्थी
विधानसभा निवडणूक जवळ येताच मिंधे सरकारचे घोटाळे अधिकाधिक गतिमान होऊ लागले आहेत. नवी मुंबईतील सिडकोच्या कोंढाणे धरण प्रकल्पात मिंधे सरकारने...
विदर्भात गुंतवणूक करायला कुणीही तयार नाही, गडकरींकडून गतिमान कारभाराची पोलखोल
बनावट सर्वोच्च न्यायालय, बोगस सरन्यायाधीश आणि खोटा निकाल! सायबर ठगांनी वर्धमान समूहाच्या अध्यक्षांना सात कोटींचा गंडा घातला
मालवण शिवपुतळा दुर्घटना; जयदीप आपटेला जामीन नाकारला
मुंबईत आढळला ‘झिका’चा रुग्ण, डेंग्यू, मलेरियाचाही विळखा
भाजपची हुकूमशाही… दिल्लीच्या सीमेवर सोनम वांगचुक यांना अटक
जगभरातून महत्त्वाच्या घडामोडी…