जे उद्धव ठाकरेंनी केलं, ते करण्याची हिंमत तुमच्यात आहे का?; राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला

जे उद्धव ठाकरेंनी केलं, ते करण्याची हिंमत तुमच्यात आहे का?; राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला

आगामी विधानसभा निवडणुकीवर ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे. महायुती आम्हाला चर्चा करायची गरज नाही त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. भारतीय जनता पक्ष हा प्रमुख पक्ष आहे बाकीचे दोन उरलेले पक्ष हे आश्रित आहे. जेव्हा आश्रित असतात तेव्हा त्यांना आवाजत नाही. भाजपबरोबर स्वाभिमानाने लढलेली फक्त शिवसेना आणि प्रसंगी लाथ मारून उद्धव ठाकरे, आम्ही बाहेर पडलो. अशी हिंमत दुसऱ्या कोणामध्ये नाही. ही शिवसेनेमध्ये होती. आम्ही बाहेर पडलो. भाजपमध्ये दिल्लीतील गुजराती व्यापार मंडळ जे आहे. जे काही त्यांच्यासमोर ते येतील तुकडे ते त्यांना स्वीकारावे लागेल, असं संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत काय म्हणाले?

स्वाभिमान अस्मिता हे विषय मुळात त्यांच्यासाठी संपलेले आहेत. जे काय मिळते ते गप्प पणे घ्या ही भारतीय पक्षाची भूमिका राहील. स्ट्राईक रेट काय असतो हा स्ट्राइक रेट भाजप आणि मोदी शाहांमुळे झाला. मोदी शाहांनी निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावरती दबाव आणला नसता तर एकनाथ शिंदे यांना धनुष्यबाण आणि चिन्ह कायद्याने मिळालं नसतं, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे

मविआचं जागावाटप कधी?

पैसा आणि यंत्रणा हा सर्व महायुतीचा स्ट्राईक रेट आहे. शिंदे आणि अजित पवार यांच्यामध्ये स्ट्राईक रेटची एवढी खूमखुमी असेल तर त्यांनी स्वतःचा पक्ष काढावा आणि निवडणूक लढवावी. मग स्ट्राइक रेट जरूर दाखवावा. आमच्यामध्ये स्ट्राईक रेट हा विषय कुठेच येत नाही. जागावाटप संदर्भात उद्यापासून आमची चर्चा सुरू होईल. 18 ,19, आणि 20 या तारखेला आम्ही तिन्ही पक्षातील लोक एकत्र बसणार आहोत आणि त्यातून जो फॉर्मुला येईल कोणी कुठून लढायचे तो अंतिम राहील. जिंकेल त्याची जागा हीच पक्षाची मागणी आहे, असं संजय राऊत म्हणाले.

नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त संजय राऊतांनी त्यांना शुभेच्छा दिल्यात. वाढदिवसाच्या शुभेच्छा… नरेंद्र मोदींच्या काळात देश पुढे वाढत असेल तर किती फुट किती मीटर वाढला ते आम्हाला बघावे लागेल. आम्हाला एवढेच माहित आहे की चायना पुढे वाढत आहे ते देखील मोदी यांच्या कार्यकाळात वाढत आहे. मणिपूर हातातून जात आहे. खासदार आणि आमदार विकत घेत आहेत, असं राऊतांनी म्हटलं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कार्यकर्त्यांनी काय-काय करायचं? अमित शाह यांनी मुंबईतल्या मेळाव्यात आखला प्लॅन, भाजपने शड्डू ठोकला कार्यकर्त्यांनी काय-काय करायचं? अमित शाह यांनी मुंबईतल्या मेळाव्यात आखला प्लॅन, भाजपने शड्डू ठोकला
महाराष्ट्रातल्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने शड्डू ठोकला आहे. भाजपला लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात पराभवाला सामोरं जावं लागल्यानंतर आगामी विधानसभा निवडणूक ही...
‘त्यावेळी’ महाराष्ट्रात फक्त भाजपचंच सरकार येणार, अमित शाह यांचं मोठं विधान
बिग बॉस होस्ट करण्यासाठी या दिग्गज मराठी अभिनेत्याला होती ऑफर, का दिला नकार?
पंढरीनाथ कांबळे घरातून बाहेर येताच म्हणाला, निक्की-अरबाजची फालतुगिरी…
विदर्भाच्या विकासाची नितीन गडकरींनी केली पोलखोल, मोठे गुंतवणूकदार येत नसल्याची दिली कबूली
लेबनानमधील पेजर स्फोटानंतर आता इराणला iPhone स्फोटाचा धोका!
Bangkok मध्ये मोठी दुर्घटना; टायर फुटल्याने स्कूल बसला आग, 25 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती