Latur news – बैलं धुण्यासाठी गेलेल्या बाप-लेकाचा तलावात बुडून मृत्यू, गणेश विसर्जनाच्या दिवशी घडली दुर्दैवी घटना

Latur news – बैलं धुण्यासाठी गेलेल्या बाप-लेकाचा तलावात बुडून मृत्यू, गणेश विसर्जनाच्या दिवशी घडली दुर्दैवी घटना

बैलं धुण्यासाठी गेलेल्या बाप-लेकाचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातील मौजे माळहिप्पगा येथे मंगळवारी ही घटना घडली. ऐन गणेश विसर्जनाच्या दिवशी या दुर्घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, माळहिप्परगा येथील शेतकरी श्रीपति बाबुराव पवार (वय – 42) आणि त्यांचा मुलगा नामदेव (वय – 12) हे दोघेही बैलं धुण्यासाठी गावाजवळील पाझर तलावावर गेले होते. बैलं धुवून बाहेर निघताना सैरभैर झालेली बैलजोडी खोल पाण्याकडे जावू लागल्याने नामदेवने त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.

बैल जोडीला बाहेर काढताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने नामदेव बुडू लागला. हे पाहताच नामदेवचे वडील श्रीपती यांनीही तिकडे धाव घेतली आणि त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पाझर तलावातील गाळामध्ये दोघेही अडकले आणि दोघांचाही मृत्यू झाला.

आसपासच्या शेतकऱ्यांना याची माहिती मिळताच त्यांनी आरडाओरडा करत गावकऱ्यांना जमा केले. पट्टीच्या पोहणाऱ्या गावकऱ्यांनी तलावात उडी घेत बाप-लेकाला बाहेर काढले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.

दरम्यान. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांनी घटनास्थळी भेट दिली आणि पंचनामा केला. पवार बाप-लेकाचे मृतदेह जळकोट येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. शवविच्छेदनानंतर माळहिप्परगा येथे दोघांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

समृद्धी महामार्गावरील अपघात घटले, आरटीओच्या उपाययोजनांना असे आले यश समृद्धी महामार्गावरील अपघात घटले, आरटीओच्या उपाययोजनांना असे आले यश
मुंबई ते नागपूर या समृद्धी महामार्गावरील अपघातामुळे चिंता व्यक्त केली जात होती. राज्यातीलच नव्हे तर देशातील सर्वात मोठ्या एक्सप्रेस हायवेवरील...
Love Life: 4 महिन्यात तिसरं लग्न मोडलं, अभिनेत्री आता चौथ्या लग्नासाठी सज्ज, आहे 3 मुलांची आई
श्वेता तिवारी पासून अरबाज खान पर्यंत, ‘या’ सेलिब्रिटींनी केलंय पाकिस्तानी सिनेविश्वात काम
आमिर खानच्या पहिल्या पत्नीच्या जवळच्या व्यक्तीचं निधन, कुटुंबावर दुःखाचा डोंगर
‘उदे गं अंबे..’ मालिकेत देवीचं हुबेहुब रुप साकारण्यासाठी महेश कोठारेंच्या पत्नीचं मोलाचं योगदान
भाजपाने लढण्याआधीच हार मानली, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत मविआचेच सरकार येणार!
दिल्लीत दोन हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त, चार जणांना अटक