Ganeshotsav 2024 – कुडाळसह सिंधुदुर्गात अकरा दिवसांच्या गणपती बाप्पांना वाजत गाजत निरोप!

Ganeshotsav 2024 – कुडाळसह सिंधुदुर्गात अकरा दिवसांच्या गणपती बाप्पांना वाजत गाजत निरोप!

कुडाळ तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र अकरा दिवसांच्या श्री गणपती बाप्पांचे मंगळवारी अनंत चतुर्थीदिवशी भक्तिमय वातावरणात विसर्जन करण्यात आले.

यावेळी गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा बाप्पाचा जयघोष करण्यात आला. त्याचबरोबर फटाक्यांच्या आतषबाजीत आणि ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली होती. सर्व वयोगटातीन नागरिकांनी गणपती विसर्जनाला उपस्थिती दाखवत वाजत गाजत लाडक्या बाप्पाला निरोप दिला. गेले अकरा दिवस घरोघरी श्री गणेश मुर्तीचे पूजन करण्यात आले. आरती, भजन, फुगड्या व अन्य विविध कार्यक्रम पार पडले. कुडाळ, कणकवली, देवगड, दोडामार्ग, वैभववाडी, मालवण, वेंगुर्ले, सावंतवाडी, बांदा आदी सर्वत्र मंगळवारी सायंकाळी समुद्र, नदी, तलाव, ओहोळ आदी ठिकठिकाणी श्री गणेश मुर्तींचे विसर्जन करण्यात आले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

गोविंदासोबतच्या दुर्घटनेविषयी अरबाज खान, अर्शद वारसीची प्रतिक्रिया; म्हणाले.. गोविंदासोबतच्या दुर्घटनेविषयी अरबाज खान, अर्शद वारसीची प्रतिक्रिया; म्हणाले..
परवाना असलेल्या बंदुकीतून चुकून गोळी सुटल्याने मंगळवारी पहाटे अभिनेता गोविंदा जखमी झाला. गोविंदाच्या पायाला गोळी लागली असून रुग्णालयातील आयसीयूमध्ये त्याच्यावर...
हा तर बिग बॉस सोडून इथे फिरतोय..; रितेश देशमुखच्या फोटोंवर चाहत्यांची नाराजी
कोणती मोठी सेलिब्रिटी आहे ही, काळं फासा हिला…, तृप्ती डिमरीवर का भडकली जनता, व्हिडीओ पाहिल्यानंतर बसेल धक्का
बहिणीकडून अभिनेत्याचा पर्दाफाश! दाखवला बेगमचा चेहरा, धर्म बदलून केला निकाह
भाजप सरकार शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देणारे! प्रणिती शिंदे यांचा हल्लाबोल
आरोपींना शोधण्यास पोलिसांना अपयश, नगर अर्बन बँक बचाव कृती समितीचा आरोप
महायुतीचे नेते स्वाभिमानी जनतेला घाबरले