लातूरमध्ये टाटा सुमोची ट्रकला धडक, तीन जणांचा जागीच मृत्यू
लातूरमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन महिला आणि एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अहमदपूर तालुक्यातील किनगाव आंबेजोगाई रोडवरील दगडवाडी येथे महामार्गावर तेलंगाना राज्यातील ट्रक हा आंबेजोगाई कडून अहमदपूर कडे जात होता. तेव्हा हा ट्रक दगडवाडी येथे एका हॉटेल समोर थांबला होता. तेव्हा किनगाव कडून जोडवाडी कडे जात असताना टाटा सुमोची या ट्रकला जोराची धडक दिली आणि अपघात झाला .या अपघातात विजयमाला गंगाधर सिरसाट (45) , सावित्री हरी सिरसाठ , एक लहान मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. टाटा सुमो चालक अच्युत सिरसाट जयश्री ज्ञानेश्वर सिरसाट व एक मुलगा गंभीर जखमी झाला असून त्यांना पुढील उपचारासाठी आंबेजोगाई येथील दवाखान्यात पाठवण्यात आले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List