देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत; ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या महिला नेत्याचं मोठं विधान

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत; ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या महिला नेत्याचं मोठं विधान

देशातच नाहीतर जगभरात मोठ्या उत्साहात गणपती बाप्पाचे वाजत-गाजत स्वागत झाले. राजकारणी, मोठे सेलिब्रिटींसह सर्वांनीच आपल्या घरात गणरायाची विधिपूर्वक स्थापना केली. आगमन झाल्यावर बाप्पाला भाजपच्या महिला नेत्याने देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, असं साकडं घातलं. आधीच निवडणुकीनंतर महायुतीमध्ये  मुख्यमंत्री कोण यावरून अनेक चर्चा आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत असं साकडं कोणी घातलं जाणून घ्या.

संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मंगलमय वातावरण आहे. वर्षेभर या दिवसाची वाट पाहतो, गणरायाचे आगमन झाले आहेत. गणराय येतानाचे जे दिवस असतात ते भारावलेले असतात. सर्व नातेवाईक एकत्र येतात. महाराष्ट्रातील जनतेला सुखी-समाधानी ठेव, काही ठिकाणी दुष्काळ पडला तर काही ठिकाणी जास्त पाऊस झाला. बळीराजा संकटात आहे, महायुती सरकारच्या माध्यमातून तातडीने मदत पोहोचण्याचं काम झालं आहे. या राज्यातील प्रत्येक घटकाचा विकास साधायचा काम महायुती सरकारच्या माध्यमातून झालं आहे, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

एक व्हिजन असणारे नेते देवेंद्र फडणवीस आमच्याकडे आहेत. त्यांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्राने प्रगतीमध्ये एक नंबर गाठला आहे. युवक, दिव्यांग, महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी असा कोणता घटक नाही, जातीपातीच्या पलीकडे जात काम करणारा आमचा नेत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्याच्या अधिकाधिक जागा निवडून येऊ द्या आणि पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदावर काम करताना बघण्याची संधी गणरायाने आम्हाला द्यावी. ही इच्छा फक्त माझीच नाहीतर समस्त महाराष्ट्रातील भाजप परिवाराची आहे. हीच इच्छा मी गणरायाकडे मागितली असल्याचं चित्र वाघ म्हणाल्या.

मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले…

आमच्याकडे चेहऱ्याचा वाद नाही. जे मुख्यमंत्री असतात तेव्हा चेहऱ्याचा वाद नसतो. त्यांच्या नेतृत्वात निवडणूक होते. निवडणुकीनंतर कोण मुख्यमंत्री होणार हे सांगण्याचा अधिकार मला नाही. आमचं पार्लमेंट्री बोर्ड ठरवेल. आज सरकार म्हणून आम्ही निवडणुकीचा प्रचार एकत्र करत आहोत, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

जमिनीवरचा पुतळा नीट बांधता येत नाही. हे समुद्रात बांधायला निघाले होते – राज ठाकरे जमिनीवरचा पुतळा नीट बांधता येत नाही. हे समुद्रात बांधायला निघाले होते – राज ठाकरे
व्हिजन वरळी या कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे यांनी बदलापूरच्या घटनेवरुन चिंता व्यक्त केली. राज ठाकरे म्हणाले की, मूळ विषयाकडून तुम्हाला...
तीच टाळी गालावर वाजवून घ्या, वाढत्या लोंढ्यांबाबत असे का म्हणाले राज ठाकरे
‘तुमच्यात जेवढी… बिल्डरसारख्या औलादींना तेच हवं असतं’; राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
कोट्यावधी संपत्ती असलेल्या बिझनेसमॅनसोबत अभिनेत्रीचे लग्न, अभिनयाला करणार कायमचा रामराम?, मोठा खुलासा…
दोन लाख रुपये देऊन झाला IPS, ड्युटी जॉईन करण्यापूर्वीच पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नालासोपारा स्थानकावर टीसीवर हॉकी स्टिकने हल्ला, आरोपी फरार
सी-लिंकवरून उडी घेत कॅब चालकाने संपवले जीवन, ऑनलाईन गेममुळे टोकाचा निर्णय घेतल्याचा संशय