Duleep Trophy 2024 – केएल राहुलने चाहत्यांची केली निराशा, बांगलादेश कसोटी मालिकेतून होणार पत्ता कट?

Duleep Trophy 2024 – केएल राहुलने चाहत्यांची केली निराशा, बांगलादेश कसोटी मालिकेतून होणार पत्ता कट?

बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेत निवड व्हावी या उद्देशाने टीम इंडियाचे अनेक स्टार खेळाडू दुलीप ट्रॉफीमध्ये चमकदार कामगिरी करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र पहिल्याच दिवशी ऋषभ पंत, सरफराज खान, यशस्वी जैसवाल, वॉशिंग्टन सुंदर, ऋतुराज गायकवाड आणि रजत पाटीदार लौकिकाला साजेसा खेळ करण्यात अपयशी ठरले. त्यामुळे चाहत्यांच्या नजरा केएल राहुलवर खिळल्या होत्या. मात्र तो सुद्धा फ्लॉप ठरला आहे.

शुभमन गिलच्या नेतृत्वात इंडिया ए संघाकडून खेळताना इंडिया बी विरुद्ध केएल राहुलने चाहत्यांचा अपेक्षाभंग केला. सामन्याच्या दुसऱ्या दिवसी राहुल 23 धावा करून नाबाद परतला होता. सामन्याच्या तिसऱ्य दिवशी तो मोठी धावसंख्या करेल अशी क्रिकेटप्रेमींची अपेक्षा होती. मात्र, राहुलने चाहत्यांचा अपेक्षाभंग करत आपल्या धावसंख्येत फक्त 14 धावांची भर घातली आणि 37 या धावसंख्येवर तो बाद झाला. राहुलने 111 चेंडूंमध्ये फक्त 37 धावा केल्या. त्यामुळे आगामी बांगालदेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी राहुलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.

टीम इंडिया आणि बांग्लादेश यांच्यामध्ये घरच्या मैदानावर 19 सप्टेंबरपासून 2 सामन्यांची कसोटी मालिका सुरू होणार आहे. या मालिकेसाठी अद्याप टीम इंडियाची घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, कर्णधार रोहित शर्मा आणि यशस्वी जैसवाल ही सलामीची जोडी म्हणून निश्चित आहे. त्याचबरोबर शुभमन गिल तिसऱ्या आणि विराट कोहली चौथ्या क्रमांकावर खेळण्याची शक्यता आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

जमिनीवरचा पुतळा नीट बांधता येत नाही. हे समुद्रात बांधायला निघाले होते – राज ठाकरे जमिनीवरचा पुतळा नीट बांधता येत नाही. हे समुद्रात बांधायला निघाले होते – राज ठाकरे
व्हिजन वरळी या कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे यांनी बदलापूरच्या घटनेवरुन चिंता व्यक्त केली. राज ठाकरे म्हणाले की, मूळ विषयाकडून तुम्हाला...
तीच टाळी गालावर वाजवून घ्या, वाढत्या लोंढ्यांबाबत असे का म्हणाले राज ठाकरे
‘तुमच्यात जेवढी… बिल्डरसारख्या औलादींना तेच हवं असतं’; राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
कोट्यावधी संपत्ती असलेल्या बिझनेसमॅनसोबत अभिनेत्रीचे लग्न, अभिनयाला करणार कायमचा रामराम?, मोठा खुलासा…
दोन लाख रुपये देऊन झाला IPS, ड्युटी जॉईन करण्यापूर्वीच पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नालासोपारा स्थानकावर टीसीवर हॉकी स्टिकने हल्ला, आरोपी फरार
सी-लिंकवरून उडी घेत कॅब चालकाने संपवले जीवन, ऑनलाईन गेममुळे टोकाचा निर्णय घेतल्याचा संशय