येणारं सरकार महाविकास आघाडीचे; भाजपच्या वाटेवरील या बड्या नेत्याच्या वक्तव्याने राज्यात एकच खळबळ

येणारं सरकार महाविकास आघाडीचे; भाजपच्या वाटेवरील या बड्या नेत्याच्या वक्तव्याने राज्यात एकच खळबळ

राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजत आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी कंबर कसली आहे. प्रत्येक मतदारसंघासाठी काय समीकरणं असतील. तिथे कोण फोडता येईल याची महाविकास आघाडीने चाचपणीच नाही तर प्रयोग पण सुरू केले आहे. त्यामुळे महायुतीची अनेक मतदारसंघात डोकेदुखी वाढणार आहे. भाजपातील इच्छुकांमध्ये चलबिचल सुरू आहे. त्यांना थोपवून ठेवण्याचे मोठे आव्हान पक्षासमोर उभे ठाकले आहे. त्यातच भाजपच्या वाटेवर असणाऱ्या या बड्या नेत्याने मात्र एकच खळबळ उडून दिली आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येण्यासाठी त्याने बाप्पालाच साकडे घातले आहे.

येणारे सरकार महाविकास आघाडीचे

येणारं सरकार महाविकास आघाडीचे असेल. महाराष्ट्राची राजकारणाची स्थिती सध्या चांगली राहिलेली नाही. जनता महागाईने त्रस्त आहे, तर फोडाफोडीच्या राजकारणाला पण जनता कंटाळलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं महाविकास आघाडीचे सरकार पुढचं येईल गणरायाकडेही मी साकडं घातलं आहे, असे वक्तव्य करुन एकनाथ खडसे यांनी खळबळ उडवून दिली आहे.

भाजप पक्ष प्रवेशाचं भिजत घोंगडं

एकनाथ खडसे यांना भाजपमध्ये यायचे आहे. पण त्यांचा अद्याप प्रवेश झालेला नाही. लोकसभेपूर्वीपासून ते भाजपमध्ये येण्याची तयारी करत आहे. याविषयीचा खुलासाच त्यांनीच अनेकदा केला. लोकसभा निवडणुकीनंतर ते दिल्लीत अमित शाह यांच्या भेटीला गेले. तेव्हा त्यांचा पक्ष प्रवेश निश्चित मानण्यात येत होता. त्यानंतर आता लखपती दीदी या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जळगाव येथे आले. तेव्हा त्यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश होणार असल्याची चर्चा रंगली. पण या कार्यक्रमाला साधं निमंत्रणही त्यांना पाठवण्यात आलं नसल्याचा आरोप खडसे यांनी केला. त्यांनी माध्यमांसमोर आपली नाराजी जाहीर केली.

भाजपमधील खानदेशच्या धुरंधरानी त्यांच्या पक्ष प्रवेशावर चिमटे काढल्यानंतर आता खडसे यांचा भाजपतील पक्ष प्रवेश बारगळल्याचे स्पष्ट झाले. तर खडसे यांनी सुद्धा एका मर्यादीत वेळेनंतर आपण राष्ट्रवादीचे काम जोरदारपणे करणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे एकूणच चित्र स्पष्ट झाले. येणारं सरकार महाविकास आघाडीचे असेल. महाराष्ट्राची राजकारणाची स्थिती सध्या चांगली राहिलेली नाही. जनता महागाईने त्रस्त आहे, तर फोडाफोडीच्या राजकारणाला पण जनता कंटाळलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं महाविकास आघाडीचे सरकार पुढचं येईल गणरायाकडेही मी साकडं घातलं आहे, असे त्यांचे वक्तव्य हे त्याचेच द्योतक वाटत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

जमिनीवरचा पुतळा नीट बांधता येत नाही. हे समुद्रात बांधायला निघाले होते – राज ठाकरे जमिनीवरचा पुतळा नीट बांधता येत नाही. हे समुद्रात बांधायला निघाले होते – राज ठाकरे
व्हिजन वरळी या कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे यांनी बदलापूरच्या घटनेवरुन चिंता व्यक्त केली. राज ठाकरे म्हणाले की, मूळ विषयाकडून तुम्हाला...
तीच टाळी गालावर वाजवून घ्या, वाढत्या लोंढ्यांबाबत असे का म्हणाले राज ठाकरे
‘तुमच्यात जेवढी… बिल्डरसारख्या औलादींना तेच हवं असतं’; राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
कोट्यावधी संपत्ती असलेल्या बिझनेसमॅनसोबत अभिनेत्रीचे लग्न, अभिनयाला करणार कायमचा रामराम?, मोठा खुलासा…
दोन लाख रुपये देऊन झाला IPS, ड्युटी जॉईन करण्यापूर्वीच पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नालासोपारा स्थानकावर टीसीवर हॉकी स्टिकने हल्ला, आरोपी फरार
सी-लिंकवरून उडी घेत कॅब चालकाने संपवले जीवन, ऑनलाईन गेममुळे टोकाचा निर्णय घेतल्याचा संशय