रत्नागिरी – गणेशभक्तांसाठी महामार्गावर 18 ठिकाणी मदतकेंद्रे
उद्यापासून सुरू होणारा गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दल सज्ज झाले आहे. मुंबई-गोवा महामार्गावरुन येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी 18 ठिकाणी मदतकेंद्र स्थापन करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली. चाकरमानी मोठ्या संख्येने कोकणात येत असल्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुक कोंडी होत आहे. ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ठिकठिकाणी वाहतूक पोलीस तैनात ठेवण्यात आले आहेत. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरीता एसआरपीएफ आणि होमगार्डची पथके तैनात ठेवण्यात आली आहेत. महामार्गावर कशेडी, चिपळूण, हातखंबा येथे 124 नियमित आणि बाहेरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List