कुंभमेळ्याला येणाऱ्या भाविकांसाठी टोलमाफी करा!

कुंभमेळ्याला येणाऱ्या भाविकांसाठी टोलमाफी करा!

प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभात येणाऱ्या भाविकांसाठी टोलमाफी करा, अशी मागणी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केली. जर मनोरंजनासाठी चित्रपट टॅक्स फ्री करू शकत असाल तर कुंभमेळ्याला येणाऱ्यांसाठी टोलदेखील माफ केला पाहिजे. दररोज महाकुंभात स्नान करण्यासाठी दूरदूरून भाविक येत आहेत. मी हिमाचल प्रदेशसह इतर राज्यांतील अनेक प्रवाशांशी बोललो. त्यामुळे सरकारने महाकुंभाला येणाऱ्या भाविकांसाठी टोलमाफी करावी, असे अखिलेश यांनी आज सांगितले. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सरकारवर हल्ला चढवला.

महाकुं भपंचतारांकित संस्कृती नाही-धर्मेंद्र दास

महाकुंभही काही पंचतारांकित संस्कृती नाही, अशा शब्दांत महंत धर्मेंद्र दास यांनी टीका केली आहे. मंत्री, नेते, अॅक्टर, मॉडेल्स महाकुंभच्या ठिकाणी येत असून त्यांच्या प्रसिद्धीवर संपूर्ण झोत आहे. त्यामुळे या पवित्र पर्वाचे लक्ष भलतीकडेच केंद्रित आहे असे सांगत साधु, संतांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मस्ती कराल तर घरी जाल… आमचे पीएस आणि ओएसडी सुद्धा मुख्यमंत्री ठरवतात; माणिकराव कोकाटेंनी टाकला बॉम्ब मस्ती कराल तर घरी जाल… आमचे पीएस आणि ओएसडी सुद्धा मुख्यमंत्री ठरवतात; माणिकराव कोकाटेंनी टाकला बॉम्ब
राज्याचे कृषी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते माणिकराव कोकाटे सध्या चांगलेच अडचणीत आले आहेत. कोर्टाने त्यांना एका प्रकरणात दोन वर्षाची शिक्षा...
मुंबई तापली… पाणीसाठा अर्ध्यावर; महापालिकेचं मुंबईकरांना मोठं आवाहन काय?
‘छावा’च्या यशानंतर कतरिना कैफ महाकुंभमध्ये; सासूसोबत घेतलं साधूंचं दर्शन
Chhaava: 112 वर्षांनंतर बॉलिवूडच्या इतिहासात विक्रम रचणारा ‘छावा’ दुसरा सिनेमा, तर पहिल्या क्रमांकावर कोणता सिनेमा?
‘इतकं सगळं असूनही ती…’ प्राजक्ता माळी अभिनेत्री आलिया भट्टबद्दल स्पष्टच बोलली
महाशिवरात्रीनिमित्त ‘जय जय स्वामी समर्थ’, ‘आई तुळजाभवानी’ मालिकांचे विशेष भाग
मुंबईतील ‘त्या’ बंगल्याने उद्ध्वस्त केले तीन सुपरस्टार्सचे आयुष्य, कुठे आहे हा बंगला?