“आत्मसंरक्षणासाठी एन्काऊंटर? आम्ही वेडे आहोत का? गृहमंत्री राजीनामा द्या”

“आत्मसंरक्षणासाठी एन्काऊंटर? आम्ही वेडे आहोत का? गृहमंत्री राजीनामा द्या”

बदलापूर प्रकरणामधील आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांकडून एन्काऊंटर झाला आहे. आरोपी अक्षय याने पोलिसांच्या गाडीमध्ये पोलीस अधिकाऱ्याचे पिस्तुल खेचून तीन राउंड फायर केले. त्यावेळी सेल्फ डिफेन्समध्ये अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झाल्याचं पोलीस सांगत आहेत. मात्र विरोधकांनी पोलिसांवरच टीका केली हे सर्व षडयंत्र असल्याचं म्हणत अक्षय शिंदचा ठरवून एन्काऊंटर केल्याचं म्हटलं आहे. आरोपी अक्षयच्या आई-वडिलांनीही पोलिसांवर आरोप करत त्यांनी पैसे घेऊन मुलाला मारल्याचं म्हटलं आहे. या घटनेनंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

अतिशय धक्कादायक, आत्मसंरक्षणासाठी एनकाउंटर? API मोरेच्या पायावर गोळ्या झाडल्या, मग अक्षय शिंदेच्या पायावर का गोळ्या मारण्यात आल्या नाहीत? आम्ही वेडे आहोत का? लोकांना मूर्ख समजले आहे का? आता मात्र हद्द झाली. गृह मंत्र्यांचा राजीनामा मिळालाच पाहिजे अक्षय शिंदेवर सगळ्यात कठोर शिक्षा व्हायला हवी होतीच, पण एनकाउंटर हे नेहमी सत्य लपवण्यासाठीच केले जातात, असं म्हणत अंजली दमानिया यांनी फडणवीसांवर निशाणा साधला.

 

शाळेच्या प्रशासनाचे गायब लोक कुठे आहेत ? कोतवाल आणि आपटे कुठे आहेत? आज पर्यंत गायब आहे हे पटते का? जर हे निर्दोष आहेत तर ते अजून फरार कशामुळे आहेत? सत्य लपवले जात आहे का? आज सरन्यायाधीश चंद्रचूड मुंबईत आहे त्यांनी ताबडतोब Suo Moto दाखल घेऊन चौकशीचे आदेश दिले पाहिजे,  अशी मागणी दमानिया यांनी केली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेला वांद्रय़ात भूखंड क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेला वांद्रय़ात भूखंड
क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेला सुसज्ज क्रीडा सुविधा केंद्र उभारण्यासाठी वांद्रे रिक्लेमेशन येथील दोन हजार चौरस मीटरचा भूखंड देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ...
खेळाच्या मैदानावर रुग्णालय उभारण्याच्या निर्णयाला आव्हान, उच्च न्यायालयात याचिका दाखल; उद्या तातडीची सुनावणी
शाळांमध्ये सीसीटीव्ही, महिला सुरक्षा रक्षक नेमणुकीच्या खर्चासाठी सरकारकडे पाठपुरावा; महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे आश्वासन
आम्ही 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा युनोच्या महासभेत दावा
‘लाडू’ वादानंतर तिरुपती मंदिराचे शुद्धीकरण! महाशांती होम, स्वयंपाकघर गोमूत्राने धुतले
छत्तीसगडमध्ये चकमकीत तीन नक्षलवादी ठार
धर्मनिरपेक्षता ही युरोपियन संकल्पना, तामीळनाडूच्या राज्यपालांचे विधान