रायगडकरांच्या सुरक्षेवर मिंधे सरकारची ‘आपत्ती’; जिल्हा प्रशासनाने पाठवलेला 110 कोटींचा प्रस्ताव लटकवला

रायगडकरांच्या सुरक्षेवर मिंधे सरकारची ‘आपत्ती’; जिल्हा प्रशासनाने पाठवलेला 110 कोटींचा प्रस्ताव लटकवला

इर्शाळवाडी, तळीयेसारखी भीषण घटना पावसाळ्यात घडते तेव्हा आपत्ती व्यवस्थापनाची खरी गरज समजते. पण लालफितीला मात्र त्याचे महत्त्व अजूनही कळलेले दिसत नाही. जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापनासाठी 110 कोटी 72 लाख 65 हजार रुपयांचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला. त्यास सहा महिने उलटून गेले तरीदेखील मंजुरी मिळालेली नाही. रायगडकरांच्या सुरक्षेवर मिंधे सरकारची जणू ‘आपत्ती’च कोसळली असून आठ तालुक्यांतील 62 गावांचे व्यवस्थापन वाऱ्यावर असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाळ्यात दरडी कोसळतात. त्यामुळे नाहक जीव जातात. घरांचेही नुकसान होते. दरवर्षी या संकटाला सामोरे जावे लागते. आतापर्यंत अनेकांचे संसार त्यात उद्ध्वस्त झाले आहेत. महाड, म्हसळा, श्रीवर्धन, पोलादपूर, माणगाव, तळा, अलिबाग, कर्जत हे तालुके आपत्तीच्या केंद्रस्थानी आहेत. खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी तसेच महाड तालुक्यातील तळीये येथील दुर्घटनेपासून सरकारने कोणताही धडा घेतल्याचे दिसून येत नाही.

निधी मिळताच काम सुरू करणार
रायगड जिल्ह्यात सातत्याने येणाऱ्या आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. दरडप्रवण क्षेत्रातील काही गावांमध्ये दगड, माती हटवणे, संरक्षक भिंत बांधणे, नैसर्गिक पाण्याचे प्रवाह सुस्थितीत करणे यांसह अन्य कामे होणे गरजेचे आहे. यासंबंधीच्या निधी मागणीचा प्रस्ताव सरकारला पाठवला आहे. निधी प्राप्त झाल्यानंतर कामाला सुरुवात करण्यात येणार आहे.
सागर पाठक, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

साहेब आमचे दैवत… अजित पवार गटाच्या नेत्याकडून शरद पवारांचं तोंडभरून कौतुक; मनात नेमकं काय? साहेब आमचे दैवत… अजित पवार गटाच्या नेत्याकडून शरद पवारांचं तोंडभरून कौतुक; मनात नेमकं काय?
राज्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. अशात राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. नरहरी झिरवळ यांचे पुत्र गोकुळ झिरवळ हे शरद...
धनगर आरक्षणाचा जीआर काढला तर मुंबईचं पाणी बंद करू, कुणी दिला इशारा ?
Aishwarya Rai: 80 वर्षांची झाल्यावर कशी दिसेल ऐश्वर्या राय? सुरकुत्या पडूनही सौंदर्य असेल कायम
Aishwarya Rai : नणंद-भावजयीत विस्तव जात नाही.. श्वेता-ऐश्वर्यामध्ये काय बिनसलं ? बच्चन कुटुंबात काय घडतंय ?
‘नवरा माझा नवसाचा 2’ची ट्रेन सुसाट; तीन दिवसांत कमावले इतके कोटी रुपये
प्रसादाच्या लाडूत चरबीचे तेल मिसळणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, मंदिर महासंघाची मागणी
खंबाटकी घाटात थरार, भरधाव कंटेनरने दहा गाडय़ांना उडविले