रायगडात साखर चौथ गणपती विराजमान

रायगडात साखर चौथ गणपती विराजमान

माघ महिन्यात गणेश जयंतीला अनेकजण आपल्या घरात लाडक्या गणरायाची प्राणप्रतिष्ठापणा करतात. त्यानंतर भाद्रपद शुद्ध चतुर्थीला सर्वत्रच आगमन झालेल्या बाप्पाला जड अंतकरणाने भाविकांनी पुढच्या वर्षी लवकर या म्हणत निरोप दिला. मात्र रायगडात प्रथेप्रमाणे अनंत चतुर्दशीच्या चार दिवसांनंतर साखर चौथ गणपतीचे आगमन झाले असून कल्याण, पनवेल, पेण, नागोठण्यासह अनेक ठिकाणी बाप्पाचा जयघोष सुरू आहे.

रायगड जिल्ह्यात प्रामुख्याने कल्याण, पनवेल, पेण, रोहे, अलिबाग या भागांत साखर चौथ गणपतीचे आगमन होते. पनवेल शहरात 68 साखर चौथ गणपती विराजमान झाले आहेत. नागोठणे येथेही शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) रायगड जिल्हा सहसंपर्कप्रमुख किशोर जैन, शिवसैनिक राजेंद्र पिताणी, दिनेश जैन, संजय तळेकर यांच्याकडेही बाप्पाची प्राणप्रतिष्ठापणा झाली आहे. मुरुडच्या नांदगाव येथे शिवशाही प्रतिष्ठानने नांदगावचा विघ्नहर्ता साखर चौथ गणपतीची स्थापना केली आहे. टाळा येथील शिक्षण प्रसारकी मंडळाने लाडक्या बापाची स्थापना केली आहे. साखर चौथ गणपती दीड, अडीच तर काही ठिकाणी पाच दिवसांचेही असतात.

शिवसेना रायगड जिल्हा सहसंपर्कप्रमुख किशोर जैन यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या बाप्पाचे नागोठणे पत्रकार संघाचे अध्यक्ष उदय भिसे, सचिव महेंद्र माने, सदस्य नारायण म्हात्रे, अर्चित भिसे व अन्य मान्यवर उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

साहेब आमचे दैवत… अजित पवार गटाच्या नेत्याकडून शरद पवारांचं तोंडभरून कौतुक; मनात नेमकं काय? साहेब आमचे दैवत… अजित पवार गटाच्या नेत्याकडून शरद पवारांचं तोंडभरून कौतुक; मनात नेमकं काय?
राज्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. अशात राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. नरहरी झिरवळ यांचे पुत्र गोकुळ झिरवळ हे शरद...
धनगर आरक्षणाचा जीआर काढला तर मुंबईचं पाणी बंद करू, कुणी दिला इशारा ?
Aishwarya Rai: 80 वर्षांची झाल्यावर कशी दिसेल ऐश्वर्या राय? सुरकुत्या पडूनही सौंदर्य असेल कायम
Aishwarya Rai : नणंद-भावजयीत विस्तव जात नाही.. श्वेता-ऐश्वर्यामध्ये काय बिनसलं ? बच्चन कुटुंबात काय घडतंय ?
‘नवरा माझा नवसाचा 2’ची ट्रेन सुसाट; तीन दिवसांत कमावले इतके कोटी रुपये
प्रसादाच्या लाडूत चरबीचे तेल मिसळणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, मंदिर महासंघाची मागणी
खंबाटकी घाटात थरार, भरधाव कंटेनरने दहा गाडय़ांना उडविले