रयतच्या शाळांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा देणार, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांचे प्रतिपादन

रयतच्या शाळांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा देणार, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांचे प्रतिपादन

आज टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जगात मोठय़ा प्रमाणात बदल होताना आपल्याला दिसत आहेत. ज्यांच्यासाठी अण्णांनी काम केले त्यांना या आधुनिक तंत्रज्ञानापासून दूर ठेवता येणार नाही. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा रयतच्या शाळांना देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी केले.

रयत संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील याच्या 137व्या जयंती समारंभात पवार बोलत होते. याप्रसंगी चेअरमन चंद्रकांत दळवी, व्हाईस चेअरमन ऍड. भगीरथ शिंदे, संघटक डॉ. अनिल पाटील, माजी खासदार श्रीनिवास पाटील, रामशेठ ठाकूर, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार सुमन पाटील, प्रभाकर देशमुख, अरुण कडू-पाटील, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के, कर्मवीर कुटुंबीय यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले, एक काळ असा होता शैक्षणिक क्षेत्रापासून बहुजन समाज दूर होता. त्यावेळी समाजातील मुला-मुलींना शिक्षणाचे दरवाजे खुले करण्याचे काम अण्णांनी केले. ज्यांना शिक्षण घेणे शक्य नाही अशा कुटुंबातील मुला-मुलींना तुम्ही कष्ट करा, कमवा आणि घाम गाळून शिका, शैक्षणिकदृष्टय़ा संपन्न व्हा, अशी योजना कर्मवीरांनी सुरू केली. या विचाराला पाठिंबा देणाऱया कार्यकर्त्यांची एक फळी तयार करायचे कामदेखील अण्णांनी केले. रामभाऊ नलावडे, तात्याराव तडसरकर, आप्पासाहेब पाटील अशा अनेक सहकाऱयांनी अण्णांची विचारधारा पुढे नेली.

अण्णांनी उत्तम नेते तयार केले. संस्था उभारण्यासाठी, संस्था चालवण्यासाठी आणि संस्थेतील कमतरता दूर करण्यासाठी समाजासाठी समाजातून मदत गोळा करण्याचे काम करणारी टीम अण्णांच्या विचाराने तयार केली. हा विचार घेऊन काम करणाऱया रयत सेवक व रयत प्रेमी यांच्यामुळे देशात अग्रगण्य संस्था म्हणून रयतचा नावलौकिक आहे. संस्थेचा विस्तार होऊन त्यात लाखो मुले-मुली शिक्षण घेत आहेत. या सगळ्यांच्या पाठीमागे कर्मवीरांचे विचार हा फार महत्त्वाचा ठेवा आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. प्रास्ताविक व स्वागत संस्थेचे सचिव विकास देशमुख यांनी केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते रयत विज्ञान पत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच संस्थेस 25 लाखांपेक्षा जास्त देणगी देणारे शकुंतला ठाकूर, रामशेठ ठाकूर, परेश ठाकूर, शुभांगी व महेंद्र घरत, नेताजी पवार, अनिल जवळेकर, यमुना सामाजिक संस्था, मैत्री मुव्हीज, राष्ट्रवादी वेल्फेअर फंड, अशोक बोरा इत्यादींचे सत्कार करण्यात आले.

पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे निवेदन संस्थेच्या उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी केले. माध्यमिक विभागाचे सहसचिव बी. एन. पवार यांनी आभार मानले. सूत्रसंचालन डॉ. सविता मेनकुदळे यांनी केले.

कुंभोज, काले ही शैक्षणिक क्षेत्राची ऐतिहासिक स्थळे

n राजर्षी शाहू महाराज, जोतिबा फुले यांची विचारधारा स्वीकारून कर्मवीरांनी आपले अख्खे आयुष्य शैक्षणिक विकासासाठी झोकून दिले. कुंभोज, काले ही दोन ठिकाणे कर्मवीरांच्या पदस्पर्शाने आणि त्यांनी हातात घेतलेल्या कार्यामुळे महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्राची ऐतिहासिक स्थळे झाली आहेत, त्याचे सर्व श्रेय कर्मवीरांना द्यावे लागेल.

कर्मवीरांच्या चित्ररथासह प्रभात फेरी

n कर्मवीर जयंतीनिमित्त साताऱयातील रयतच्या शाखेतील रयत सेवक व विद्यार्थी एकत्र येत कर्मवीरांच्या चित्ररथासह सातारा शहरात प्रभात फेरी काढण्यात आली तसेच समाजसुधारकांच्या पुतळ्यांना पदाधिकारी यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

साहेब आमचे दैवत… अजित पवार गटाच्या नेत्याकडून शरद पवारांचं तोंडभरून कौतुक; मनात नेमकं काय? साहेब आमचे दैवत… अजित पवार गटाच्या नेत्याकडून शरद पवारांचं तोंडभरून कौतुक; मनात नेमकं काय?
राज्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. अशात राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. नरहरी झिरवळ यांचे पुत्र गोकुळ झिरवळ हे शरद...
धनगर आरक्षणाचा जीआर काढला तर मुंबईचं पाणी बंद करू, कुणी दिला इशारा ?
Aishwarya Rai: 80 वर्षांची झाल्यावर कशी दिसेल ऐश्वर्या राय? सुरकुत्या पडूनही सौंदर्य असेल कायम
Aishwarya Rai : नणंद-भावजयीत विस्तव जात नाही.. श्वेता-ऐश्वर्यामध्ये काय बिनसलं ? बच्चन कुटुंबात काय घडतंय ?
‘नवरा माझा नवसाचा 2’ची ट्रेन सुसाट; तीन दिवसांत कमावले इतके कोटी रुपये
प्रसादाच्या लाडूत चरबीचे तेल मिसळणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, मंदिर महासंघाची मागणी
खंबाटकी घाटात थरार, भरधाव कंटेनरने दहा गाडय़ांना उडविले