बाहेरच्या लोकांना आम्ही का कड्यावर घ्यायचं, राज ठाकरे कडाडले

बाहेरच्या लोकांना आम्ही का कड्यावर घ्यायचं, राज ठाकरे कडाडले

वरळी व्हिजन या कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे यांनी सरकार आणि विरोधक दोघांवर टीका केली आहे. मराठी माणसांच्या हातातून मुंबई जातेय हे त्यांनी पुन्हा एकदा लक्षात आणून दिलं. राज ठाकरे म्हणाले की, आपल्याकडे डेव्हल्पमेंट प्लान होतं. पण टाऊन प्लानिंग होत नाही. आपल्याकडे किती लोकसंख्या वाढणार, तेवढे रस्ते आहे का, कॉलेज, ‘हॉस्पिटल येणार का, मार्केट येणार आहे का, थिएटर येणार का याचा विचार केला जात नाही. आम्ही त्याचा विचार करत नाही. आपण फक्त स्क्वेअर फुटात अडकलोय. राहिल्या आल्यानंतर जगायचं कसं याचे प्रश्न विचारतो का. आम्हीच प्रश्न विचारत नाही. तुमची स्वतची हक्काची जमीन समोरच्याला देत असताना तुम्ही प्रश्न विचारत नाही. हेच त्यांना हवं असतं. बिल्डर सारख्या औलादींना हवं असतं. तुमच्यात जेवढी फुट पडेल तेवढं त्यांना हवंच असतं. राजकारणी आहेच बसलेले. तुम्ही एकत्र राहणं, विचार करणं गरजेचं आहे. एकमुखाने विचार करून बोलणं महत्त्वाचं आहे. तर हाताला काही गोष्टी लागतील.’

‘प्रत्येक शहराचं एक कॅरेक्टर असतं. लाल बस ही मुंबईची ओळख होती. आज कोणत्याही शहराला कॅरेक्टर उरलेलं नाही. सगळीकडे फ्लायओव्हक आणि ब्रिज होताय. पण हे कोणासाठी आणि का होतंय. माणसं वाढायला लागलीये. बाहेरुन येणाऱ्या लोकांची संख्या वाढत आहेत. मुंबई वाढत जातेय. त्यामुळे त्यांना सुविधा देण्यासाठी पैसा खर्च होतोय. मुळ जिथे खर्च व्हायला पाहिजे तिथे न होता पैसा खर्च होतोय.’

‘ठाणे जिल्ह्यात बाहेरचे लोकं येत आहेत. एकाच जिल्ह्यात आठ महापालिका आहे. बाहेरच्या लोकांनी आम्ही का कड्यावर घ्यायचं. राजकारणात कशाला मग यायचं. मुळ गोष्टीकडे कोणाचं लक्षच जात नाही. बदलापूरमधील घटना आपल्याच लोकांनी बाहेर काढलं. नाहीतर बाहेरपण आलं नसतं. दरवर्षी या महाराष्ट्रात ३ ते ४ हजार बलात्कार होत आहेत. हा सरकारी आकडा सांगतोय. यावर इलाज कोणी शोधायला तयार नाही. फक्त टीका करायच्या. शाळेत लहान मुली पाठवायच्या आणि असे प्रकार घडणार.’

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

जमिनीवरचा पुतळा नीट बांधता येत नाही. हे समुद्रात बांधायला निघाले होते – राज ठाकरे जमिनीवरचा पुतळा नीट बांधता येत नाही. हे समुद्रात बांधायला निघाले होते – राज ठाकरे
व्हिजन वरळी या कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे यांनी बदलापूरच्या घटनेवरुन चिंता व्यक्त केली. राज ठाकरे म्हणाले की, मूळ विषयाकडून तुम्हाला...
तीच टाळी गालावर वाजवून घ्या, वाढत्या लोंढ्यांबाबत असे का म्हणाले राज ठाकरे
‘तुमच्यात जेवढी… बिल्डरसारख्या औलादींना तेच हवं असतं’; राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
कोट्यावधी संपत्ती असलेल्या बिझनेसमॅनसोबत अभिनेत्रीचे लग्न, अभिनयाला करणार कायमचा रामराम?, मोठा खुलासा…
दोन लाख रुपये देऊन झाला IPS, ड्युटी जॉईन करण्यापूर्वीच पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नालासोपारा स्थानकावर टीसीवर हॉकी स्टिकने हल्ला, आरोपी फरार
सी-लिंकवरून उडी घेत कॅब चालकाने संपवले जीवन, ऑनलाईन गेममुळे टोकाचा निर्णय घेतल्याचा संशय