तिरुपती देवस्थानाच्या प्रसादाच्या लाडूत तुपाऐवजी चरबीचा वापर, चंद्राबाबू नायडूंचा गंभीर आरोप

तिरुपती देवस्थानाच्या प्रसादाच्या लाडूत तुपाऐवजी चरबीचा वापर, चंद्राबाबू नायडूंचा गंभीर आरोप

तिरुपती बालाजीच्या प्रसाद लाडूंमध्ये प्राण्यांच्या चरबीचा वापर केल्याचा आरोप मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंनी जगन मोहन रेड्डींवर केलाय. नॅशनल डेअरी रिपोर्टच्या तपासणीतही लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. दरम्यान यानंतर केंद्र सरकारनं मंदिर समितीकडून अहवाल मागितलाय.

तिरुपती मंदिरातील लाडूत चरबी मिळाल्याची पुष्टी नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डनं केली. जगनमोहन रेड्डींच्या काळात तिरुपती देवस्थानाच्या प्रसादाच्या लाडूत तुपाऐवजी चरबीचा वापर केल्याचा आरोप, चंद्राबाबू नायडूंच्या दाव्यामुळे आंध्र प्रदेशात मोठा वाद निर्माण झाला. आमचं सरकार आल्यापासून आम्ही शुद्ध तुपातील लाडू तयार करण्यास सुरुवात केली-चंद्राबाबू

मंदिरातील अन्नदानात दिल्या जाणाऱ्या जेवणाचा दर्जाही आम्ही सुधारला-चंद्राबाबू. तिरुपती बालाजी मंदिरातील लाडू प्रकरणावरुन महाराष्ट्रातलं राजकारणही चांगलंच तापलंय. मविआचं सरकार आल्यास पंढरपूर, शिर्डीच्या मंदिरातही लाडूंमध्ये भेसळ पाहायला मिळणार असा आरोप भाजपच्या सुनील देवधरांनी केलाय.

भाजपचे सुनील देवधरच नव्हे शिंदे गटानं देखील या प्रकरणावरुन महाविकास आघाडीला सवाल केलाय. तसंच ठाकरे गटानं या संपूर्ण प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी श्रीकांत शिंदेंनी केलीय. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंनी केलेल्या आरोपानंतर
केंद्रानं मंदिर समितीकडून अहवाल मागितलाय. दरम्यान मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे दिशाभूल करत असल्याचं म्हणत माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींनी त्यांच्यावरचे आरोप फेटाळले आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आदिवासी आमदारांच्या आंदोलनानंतर सरकारकडून पेसा भरतीवर तोडगा, आता अशी भरती होणार आदिवासी आमदारांच्या आंदोलनानंतर सरकारकडून पेसा भरतीवर तोडगा, आता अशी भरती होणार
आदिवासी समाजातील आमदारांनी शुक्रवारी धक्कादायक निर्णय घेतला. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, आमदार हिरामण खोसकर, हेमंत सावरा यांच्यासह काही जणांनी धनगरांचा...
प्रियांका चोप्रा हिचा ‘तो’ अत्यंत मोठा खुलासा, म्हणाली, मी आयुष्यात..
श्वेता तिवारी दुसऱ्याचा संसार उद्ध्वस्त करणारी महिला…, खासदाराच्या पहिल्या पत्नीचे अभिनेत्रीवर गंभीर आरोप
बदाम या पद्धतीने खाल्ले तर ठरेल विष, सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी म्हटले दारुपेक्षा धोकादायक ठरले असे खाणे
Ratnagiri News – रिळ-उंडी MIDC रद्द करा अन्यथा विधानसभेला मतदानावर बहिष्कार; गावकऱ्यांचा महायुती सरकारला इशारा
अरविंद केजरीवाल यांनी सोडले मुख्यमंत्री आवास, कर्मचाऱ्यांना मिठी मारून दिला निरोप
योजनांसाठी महिन्याला 3 हजार कोटी रुपयांचं कर्ज? महाराष्ट्राच्या तिजोरीत खडखडाट