दुर्दैवाने महाराष्ट्र महिलांसाठी असुरक्षित, पुणे सामूहिक बलात्कार प्रकरणी सुप्रिया सुळे यांची टीका

दुर्दैवाने महाराष्ट्र महिलांसाठी असुरक्षित, पुणे सामूहिक बलात्कार प्रकरणी सुप्रिया सुळे यांची टीका

पुण्यात एका 21 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला होता. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. एक्सवर पोस्ट करून सुळे म्हणाल्या की, अतिशय संतापजनक! पुण्यात हे काय सुरू आहे?

बोपदेव घाटात एका मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना उजेडात आली आहे. पुणे आणि राज्यभरात सातत्याने महिलांवरील अत्याचारांच्या घटना वाढतच आहेत.या घटनांना पायबंद घालण्यासाठी गृहखाते काहीही करताना दिसत नाही. दुर्दैवाने महाराष्ट्र महिलांसाठी सुरक्षित राहीलेला नाही, असे म्हणावे लागत आहे. शासनाने सदर घटनेतील आरोपींना गजाआड करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणीही सुळे यांनी केली आहे.

कायदा सुव्यवस्था व्हेंटिलेटवर

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही बोपदेव घटनेप्रकरणी राज्य सरकारवर टीका केली आहे. राज्यातली कायदा सुव्यवस्था व्हेटिलेटरवर असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
एक्सवर पोस्ट करून रोहित पवार म्हणाले की, बोपदेव घाटात घडलेली सामुहिक अत्याचाराची घटना महाराष्ट्राला काळिमा फासणारी आहे. शाळा, कॉलेजे, रस्ते, हॉस्पिटल्स काहीही आज सुरक्षित राहिलेले नाहीत, परिणामी महाराष्ट्रात कधी नव्हती एवढी असुरक्षेची भावना आज पसरली आहे.

राज्यात कायदा-सुव्यवस्था व्हेंटिलेटरवर पोहचली असताना राज्याचे गृहमंत्री मात्र धृतराष्ट्राप्रमाणे सत्तेच्या मोहात आंधळे होऊन महिला सुरक्षेच्या विषयाकडे दुर्लक्ष करत आहेत. एकीकडे महिला सन्मानाच्या गोल गोल गप्पा करायच्या आणि दुसरीकडे मात्र शक्ती कायदा लागू करण्यासंदर्भात काहीच करायचं नाही ही दुटप्पी भूमिका योग्य नाही असेही पवार म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आदिवासी आमदारांच्या आंदोलनानंतर सरकारकडून पेसा भरतीवर तोडगा, आता अशी भरती होणार आदिवासी आमदारांच्या आंदोलनानंतर सरकारकडून पेसा भरतीवर तोडगा, आता अशी भरती होणार
आदिवासी समाजातील आमदारांनी शुक्रवारी धक्कादायक निर्णय घेतला. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, आमदार हिरामण खोसकर, हेमंत सावरा यांच्यासह काही जणांनी धनगरांचा...
प्रियांका चोप्रा हिचा ‘तो’ अत्यंत मोठा खुलासा, म्हणाली, मी आयुष्यात..
श्वेता तिवारी दुसऱ्याचा संसार उद्ध्वस्त करणारी महिला…, खासदाराच्या पहिल्या पत्नीचे अभिनेत्रीवर गंभीर आरोप
बदाम या पद्धतीने खाल्ले तर ठरेल विष, सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी म्हटले दारुपेक्षा धोकादायक ठरले असे खाणे
Ratnagiri News – रिळ-उंडी MIDC रद्द करा अन्यथा विधानसभेला मतदानावर बहिष्कार; गावकऱ्यांचा महायुती सरकारला इशारा
अरविंद केजरीवाल यांनी सोडले मुख्यमंत्री आवास, कर्मचाऱ्यांना मिठी मारून दिला निरोप
योजनांसाठी महिन्याला 3 हजार कोटी रुपयांचं कर्ज? महाराष्ट्राच्या तिजोरीत खडखडाट