सिनेट निवडणुकीत शिंदे सरकारचा पुन्हा हस्तक्षेप? दोन दिवसांवर मतदान असताना मुंबई विद्यापीठाकडून पुन्हा निवडणूक स्थगित

सिनेट निवडणुकीत शिंदे सरकारचा पुन्हा हस्तक्षेप? दोन दिवसांवर मतदान असताना मुंबई विद्यापीठाकडून पुन्हा निवडणूक स्थगित

मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक पुन्हा एकदा स्थागित करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाकडून आदेश प्राप्त झाल्याने निवडणूक स्थगित करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे सिनेट निवडणुकीसाठी दोन दिवसांनी म्हणजेच 22 सप्टेंबरला मतदान होणार होतं. या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट विरुद्ध ABVP अशी थेट लढत होणार होती. पण अचानक या निवडणुकीला स्थगिती देण्यात आली आहे. दोन दिवसावर मतदान आलं असताना अचानक सिनेट निवडणूक स्थगित झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये विविध चर्चांना उधाण आलं आहे. मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून याबाबतचं प्रसिद्धीपत्रक जारी करुन माहिती देण्यात आली आहे.

“महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम २८(२) (न) [28(2) (t)] प्रमाणे (१०) नोंदणीकृत पदवीधरांच्या संघाच्या निवडणूकीची निवडणूक अधिसूचना ३ आगस्ट, २०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर अधिसूचनेमध्ये नोंदणीकृत पदवीधर मतदार संघाची निवडणूक दिनांक २२ सप्टेंबर २०२४ रोजी होती”, असं पत्रकात सुरुवातीला म्हटलं आहे.

पत्रकात नेमकं काय म्हटलं आहे?

“उपरोक्त निवडणुकीच्या अनुषंघाने संबंधित मतदारांना, उमेदवारांना, निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या निवडणूक अधिकारी, मतदान केंद्र प्रमुख, अधिकारी आणि कर्मचारी वर्गाला कळविण्यात येते की, महाराष्ट्र शासना कडून प्राप्त झालेल्या आदेशानुसार दिनांक २२ सप्टेंबर २०२४ रोजी होणारी नोंदणीकृत पदवीधर मतदारसंघाची निवडणूक शासनाकडून पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत स्थगित करण्यात येत आहे. याबाबत ची नोंद सबंधित मतदारांनी, उमेदवारांनी, निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या निवडणुक अधिकारी, मतदान केंद्र प्रमुख, अधिकारी व कर्मचारी वर्गानी घ्यावी ही विनंती”, असं पत्रकात म्हटलं आहे.

‘मिंधेची गद्दार टोळी निवडणुकीला इतकी घाबरलेली…’

शिवसेना ठाकरे गटाचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सिनेट निवडणूक स्थगित केल्यावरुन शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. “पदवीसाठी मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक रद्द केल्याने भाजप आणि बेकायदेशीर मिंधे संघटना किती घाबरले आहेत हेच दिसून येते. मिंधेची गद्दार टोळी निवडणुकीला इतकी घाबरलेली आहे की त्यांनी मतदानाच्या एक दिवस आधी मुंबई विद्यापीठ सिनेटची निवडणूक रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. आता त्यांनी लोकशाहीचे काय केले हे जगाने पाहावे असा हा प्रकार आहे. त्यांना निवडणुकीची भीती वाटते आणि ते वन नेशन, वन पोलची चर्चा करतात, किती लाजिरवाणे, भ्याड गदार निवडणुकीला कात्री लावतात”, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

‘कुलगुरू हे भाजप आणि शिंदे गटाच्या स्क्रिप्टनुसार…’

छात्र भारतीचे सिनेट उमेदवार रोहित ढाले यांनी महापालिकेच्या या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. “दोन दिवसात सिनेट निवडणूक होणार होती आणि आज अचानक रात्री 8 वाजता परिपत्रक काढून सिनेट रद्द केली. विद्यापीठ आणि कुलगुरू यांचा आम्ही निषेध करतो. मागच्या तीन वर्षात दोनवेळा ही निवडणुक रद्द केली. भाजप आणि शिंदे गटाच्या म्हणण्यानुसार कुलगुरू आणि विद्यापीठ चालत आहे. निवडणूक घेण्याची तुमची हिंमत नसेल तर राज्य करण्याचा तुमचा अधिकार नाही. कुलगुरू हे भाजप आणि शिंदे गटाच्या स्क्रिप्टनुसार चालत आहेत”, असा घणाघात रोहित ढोले यांनी केलाय.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Cancer: तुमची सकाळची एक चुक डोकं आणि मानेच्या कॅन्सरला आमंत्रण देऊ शकते, अभ्यासात धक्कादायक निष्कर्ष Cancer: तुमची सकाळची एक चुक डोकं आणि मानेच्या कॅन्सरला आमंत्रण देऊ शकते, अभ्यासात धक्कादायक निष्कर्ष
तुमची  सकाळची एक चुक डोकं आणि मानेचा कॅन्सरला आमंत्रण देऊ शकते. नवीन अभ्यासात असे आढळले आहे की दररोज ब्रश करणारे...
कोणी पैसे देत का पैसे! पाकिस्तानी खेळाडूंचे बेकार हाल, चार महिन्यांपासून पगारच मिळाला नाही
निवडणुकांच्या तोंडावर का होईना अखेर केंद्र सरकार झुकलं… मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया
महामारीसाठी तयार रहा, काळजी वाढवणारा निती आयोगाचा अहवाल
अखेर आज तो सुदिन अवतरला; देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया; राज्यातील नेते काय म्हणाले?
महाभारतात द्रौपदीची भूमिका करणाऱ्या अभिनेत्री रुपा गांगुली यांना अटक, कारण काय?
शिवतीर्थावर आवाज शिवसेनेचाच! पालिकेकडून मेळाव्यासाठी रीतसर परवानगी, उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार