उंदरांमुळे मुंबई-दिल्ली महामार्ग खचला, कर्मचाऱ्याचा अजब दावा; कंपनीने केली हकालपट्टी

उंदरांमुळे मुंबई-दिल्ली महामार्ग खचला, कर्मचाऱ्याचा अजब दावा; कंपनीने केली हकालपट्टी

पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झालेला मुंबई-दिल्ली महामार्ग वर्षभराच्या आतच खचला. मात्र रस्ता खचण्याचे अजब कारण महामार्ग बांधणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्याने सांगितले. यानंतर महामार्ग खचला यापेक्षा कर्मचाऱ्याने दिलेल्या कारणामुळे सर्वत्र टीकेची झोड उठली आहे. उंदरांमुळे महामार्ग खचल्याचा दावा या कर्मचाऱ्याने केला होता. यानंतर सदर कंपनीने या कर्मचाऱ्याची हकालपट्टी केली आहे.

उंदीर किंवा छोट्या प्राण्याने हा खड्डा केला असावा. ज्यामुळे पाणी झिरपून मोठा खड्डा पडला असावा, असा अजब दावा कर्मचाऱ्याने केला होता. यानंतर सदर कंपनीने एक निवेदन जारी केले आहे. कर्मचाऱ्याला महामार्ग बांधणीचे कोणतेही तांत्रिक ज्ञान नव्हते. हा कर्मचारी मेन्टेनन्स व्यवस्थापक नव्हता. त्याने केलेला दावा चुकीचा होता. त्यामुळे त्याला कंपनीतून काढून टाकण्यात येत आहे, असे कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

मुंबई-दिल्ली महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 ऑक्टोबर 2023 रोजी अनावरण केले होते. हा महामार्ग 1,386 किलोमीटरचा असून तो भारतातील सर्वात मोठा महामार्ग आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Cancer: तुमची सकाळची एक चुक डोकं आणि मानेच्या कॅन्सरला आमंत्रण देऊ शकते, अभ्यासात धक्कादायक निष्कर्ष Cancer: तुमची सकाळची एक चुक डोकं आणि मानेच्या कॅन्सरला आमंत्रण देऊ शकते, अभ्यासात धक्कादायक निष्कर्ष
तुमची  सकाळची एक चुक डोकं आणि मानेचा कॅन्सरला आमंत्रण देऊ शकते. नवीन अभ्यासात असे आढळले आहे की दररोज ब्रश करणारे...
कोणी पैसे देत का पैसे! पाकिस्तानी खेळाडूंचे बेकार हाल, चार महिन्यांपासून पगारच मिळाला नाही
निवडणुकांच्या तोंडावर का होईना अखेर केंद्र सरकार झुकलं… मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया
महामारीसाठी तयार रहा, काळजी वाढवणारा निती आयोगाचा अहवाल
अखेर आज तो सुदिन अवतरला; देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया; राज्यातील नेते काय म्हणाले?
महाभारतात द्रौपदीची भूमिका करणाऱ्या अभिनेत्री रुपा गांगुली यांना अटक, कारण काय?
शिवतीर्थावर आवाज शिवसेनेचाच! पालिकेकडून मेळाव्यासाठी रीतसर परवानगी, उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार