चंद्रपुरात गणपती बप्पांची मूर्ती 84 वर्षांपासून विसर्जनाच्या प्रतीक्षेत; जाणून घ्या कारण…
देशात रामराज्य आल्याशिवाय या गणेश मुर्तीचे विसर्जन करायचे नाही, असा संकल्प चंद्रपुरातील काही युवकांनी केला होता. त्यामुळे त्यांनी सुमारे 84 वर्षांपूर्वी स्थापन केलेली गांधीजींच्या रूपातील गणेश मूर्ती आजही विसर्जनाच्या प्रतीक्षेत आहे.
चंद्रपुरातील गांधी चौकात 1940 मध्ये महात्मा गांधी यांची रुपातील गणेशाची मूर्ती बसवण्यात आली होती. मात्र, ब्रिटिशांनी उत्सव साजरा करण्यास मनाई केल्याने मूर्तीची विटंबना होईल, या भीतीने ही मूर्ती एका गोदामात ठेवण्यात आली. येथील नागरिक मनोहर कोतपल्लीवार यांच्या नजरेस ही मूर्ती पडली. अडगळीत पडलेली ही मूर्ती त्यांनी गांधी चौकाजवळ असलेल्या कन्यका मंदिरात स्थापन केली. त्याकाळी देशाला स्वातंत्र्य मिळाले नव्हते. जोपर्यंत देशात रामराज्य येणार नाही, तोपर्यंत या मूर्तीचे विसर्जन करायचे नाही, असा संकल्प ही मूर्ती स्थापन करताना करण्यात आला होता.
आजही ही मुर्ती कन्यका मंदिरात सुरक्षितपणे जतन करण्यात आली आहे. तत्कालीन युवकांच्या संकल्पाप्रमाणे देशात अजूनही रामराज्य आलेले नाही. त्यामुळे या मूर्तीचे अद्याप विसर्जन करता आलेले नाही, असे कन्यका मंदिराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List