‘सब का साथ, सब का विकास’मुळे मळमळायला लागलं, मोदींनी पंतप्रधान पद सोडावं आणि… शरद पोंक्षेंचं मोठं विधान

‘सब का साथ, सब का विकास’मुळे मळमळायला लागलं, मोदींनी पंतप्रधान पद सोडावं आणि… शरद पोंक्षेंचं मोठं विधान

लोकसभा निवडणुकीत जनतेने भाजपला नकारले आहे. या आधी स्वबळावर सत्तेत असलेल्या भाजपला सत्तास्थापनेसाठी एनडीच्या कुबड्यांची गरज भासली आहे. तसेच मणिपूरसह अनेक मुद्द्यांवर संघानेही भाजपला चांगलेच सुनावले आहे. त्यातच आता अभिनेते शरद पोंक्षे यांनी हिंदुत्वासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पायउतार व्हावे, असे विधान केले आहे. तसेच ‘सब का साथ, सब का विकास’मुळे मळमळायला लागलं, असेही ते म्हणाले. त्यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. सांगलीतील एका कार्यक्रमात पोंक्षे यांनी याबाबतचे मत व्यक्त केले.

आतापर्यंत आपल्या देशावर अनेकांनी आक्रमणे केली. मात्र, कोणालाही हिंदू धर्म संपवता आला नाही. हे सत्य असले तरी आता या कल्पनेत कायम राहू नये. देशाला हिंदू राष्ट्र कायम ठेवायचं असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पायउतार होण्याची गरज आहे. मोदींनी पायउतार होत देशाचं नेतृत्व हे योगी आदित्यनाथ यांच्याकडे द्यावं, असं मत शरद पोंक्षे यांनी व्यक्त केलं. ‘भारत: काल, आज आणि उद्या’ या विषयावर त्यांनी हे मत व्यक्त केले.

मुस्लिमांना त्यांच्या हक्काची अनेक राष्ट्रं आहेत. हिंदू धर्मासाठी भारत हा एकच देश आहे. इथून हाकललं तर आसरा घ्यायला आपल्याला दुसरं राष्ट्र नाही. त्यामुळे भारताला हिंदू राष्ट्र कायम ठेवायचं असेल, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचं नेतृत्व योगी आदित्यनाथ यांच्याकडे द्यावं असं मत शरद पोंक्षे यांनी व्यक्त केलं. ‘सब का साथ, सब का विकास’ यामुळे आता मळमळायला लागलं आहे असं शरद पोंक्षे म्हणाले. एबीपी माझानं यासंदर्भातील एक वृत्त प्रसिद्ध केलं असून यासोबत पोंक्षे यांच्या अधिकृत हँडलवरील पोस्ट देखील शेअर केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sharad Ponkshe (@sharadponkshe)

हिंदूंना संपवण्यासाठी जाती-जातींमध्ये विष पेरलं जात आहे. आपण यापासून दूर राहून सनातनी संस्कृती टिकवायला हवी. ज्या क्षणी आपण 49 टक्क्यांवर आलो त्या क्षणी आपला देश संपेल. निसर्गाने ज्याला बनवलंय त्याला कुणी संपवू शकत नाही. हा निसर्गच निसर्गाला संपवेल, माणूस नाही. चौथ्या पाचव्या शतकापासून देशावर अनेक आक्रमणं झाली. पण कुणाच्यात धमक झाली नाही हिंदू राष्ट्र संपवण्याची. कुणालाही जमलं नाही. मात्र, आता या कल्पनेत कायम राहू नये. अखंड सावध असावे असं समर्थ म्हणतात, असेही पोंक्षे यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण? कशी होणार निवड, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा मोठा खुलासा, काय आहे फॉर्म्युला महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण? कशी होणार निवड, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा मोठा खुलासा, काय आहे फॉर्म्युला
राज्यात विधानसभा निवडणुकीपूर्वीच मुख्यमंत्री कोण होणार? यावरून महायुती आणि महाविकास आघाडीत मोठी खलबतं सुरू आहेत. महायुतीत तर या पदावरून रस्सीखेच...
परिणीती चोप्रा हिने शेअर केला राघव चड्ढा याच्यासोबतचा ‘तो’ खास व्हिडीओ, अभिनेत्रीने पोस्टमध्ये थेट…
चंद्रशेखर बावनकुळेंच्या संस्थानला 5 कोटींचा भूखंड फुटकळ दरात दिल्याचा आरोप, वडेट्टीवार यांचा हल्लाबोल
दर्शनाला चाललेल्या कुटुंबाच्या रिक्षाला ट्रकची धडक, अपघातात 9 जणांचा मृत्यू
मुख्यमंत्री व्हायचंय, पण गाडी उपमुख्यमंत्रिपदावरच अडकते, अजित पवारांनी व्यक्त केली खंत
अंत्यसंस्काराठी स्मशानात तिरडी घेऊन जाताना ग्रामपंचायतीचा निषेध, वाढवणा खुर्द येथील घटना
भाजपाने आरएसएसशी संबंधित लोकांना वाचविण्यासाठी शिंदेचा एन्काउंटर केला – विजय वडेट्टीवार