मिंध्यांना खुले आव्हान; नाईकांचा ठाण्यातील जनता दरबार फिक्स

मिंध्यांना खुले आव्हान; नाईकांचा ठाण्यातील जनता दरबार फिक्स

मिंधे गटात अस्वस्थता निर्माण करणारे राज्याचे वनमंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबाराची तारीख फिक्स झाली आहे. 24 फेब्रुवारी रोजी ठाण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले असल्याने मिंध्यांना थेट खुले आव्हान देण्याची तयारी भाजपने केली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरदार सुरू झाली आहे.

मिंधे गटावर अंकुश ठेवण्यासाठी भाजपने ठाणे जिल्ह्याचे संपर्कमंत्री म्हणून गणेश नाईक यांची निवड केली आहे. दरम्यान नाईक यांची वनमंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर काही दिवसांपूर्वी कोपरी येथे भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी भाषणात बोलताना ठाण्याचा कारभार सुधारायचा असल्याने जनता दरबार घेणार अशी घोषणा नाईकांनी केली होती. त्यांनतर राजकीय वातावरण चांगले तापले. दरम्यान जनता दरबार कोणीही कुठेही घेऊ शकतो, महायुतीच्या मंत्र्यांनी जिकडे पाहिजे तिकडे दरबार घ्यावा, असे आवाहन नाईक यांनी करत मी लवकरच जनता दरबार घेणार असल्याची आठवण पुन्हा करून दिली असल्याने ठाण्याचे राजकारण ढवळून निघणार आहे.

भाजपच्या माजी नगरसेवकांचा आग्रह

गेल्या अडीच वर्षांत ठाणेकरांना अनेक समस्यांनी ग्रासले आहे. त्यातच मिंधे गटाच्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे चालत नसल्याने नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या कोणाच्या दरबारी मांडायच्या, असा प्रश्न लोकप्रतिनिधींना पडला आहे. त्यामुळे नाईकांनी पालघरसह ठाण्यातही जनता दरबार घ्यावा, असा आग्रह भाजपच्या माजी नगरसेवकांनी नाईकांकडे धरला होता.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

हाय सिक्योरिटी नंबर प्लेटचे दर इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रातील जास्त का? थेट परिवहन आयुक्तांनी सांगितले कारण हाय सिक्योरिटी नंबर प्लेटचे दर इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रातील जास्त का? थेट परिवहन आयुक्तांनी सांगितले कारण
High Security Number Plate: महाराष्ट्रात हाय सिक्योरिटी नंबर प्लेटचे दर इतर राज्यांपेक्षा जास्त आहेत, असा आरोप काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून...
मोठी बातमी ! एकनाथ शिंदे गटाला फडणवीस सरकारचा पहिला झटका; त्या कामांना दिली स्थगिती
Champions Trophy – अफगानिस्तानचं स्वप्न धुळीस, दक्षिण आफ्रिकेची सेमी फायनलमध्ये धडक
नवीन कितीही शहरे बनवा, मुंबईचे महत्त्व कमी होणार नाही; आदित्य ठाकरे यांनी ठणकावले
बीडच्या संतोष देशमुख प्रकरणाबाबत प्रश्न विचारला; पंकजा मुंडे पत्रकारावरच संतापल्या
पोलीस असो की अधिकारी या गुन्ह्यात सापडला तर थेट बडतर्फीच, मुख्यमंत्र्यांचा पोलीस यंत्रणेला इशारा
तब्बल ८५ वर्षांनंतर राज्य परिवहन विभागाला कार्यालय मिळण्याचा मार्ग मोकळा, पाहा काय घडामोडी