नगरचे झाले अहिल्यानगर, केंद्र सरकारकडून जिल्ह्याच्या नामांतराला मंजुरी
नगर जिल्ह्याचे नामांतर आता अहिल्यानगर झाले आहे. केंद्र सरकारने या नामांतराला मंजुरी दिली आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक्सवर पोस्ट करून ही माहिती दिली आहे.
औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशीव करावे अशी मागणी होती. तसेच अहमदनगरचे नाव बदलून अहिल्यानगर करावे अशीही मागणी होती. औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नामांतर झाल्यानंतर नगरचे नामांतर झाले नव्हते. आता केंद्र सरकारने मंजुरी दिल्यानंतर जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर करण्यात आले आहे. जिल्ह्याचे नाव बदलल्यानंतर रेल्वे स्थानकाचे नावही बदलण्यात येणार आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एका पत्रकार परिषदेत रेल्वे स्थानकाचे नाव बदलले जाईल, अशी माहिती दिली होती.
अहील्यानगर नामांतराची वचनपूर्ती!!!
नगर जिल्ह्याचे नामांतर अहील्यानगर करण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजूरी दिली.आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत जिल्ह्याचे नामकरण अहील्यानगर करण्यास मान्यता मिळाल्याने वचनपूर्ती झाल्याचा मनस्वी आनंद आहे.
निर्णय होण्याकरीता सहकार्य करणारे…— Radhakrishna Vikhe Patil (@RVikhePatil) October 4, 2024
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List