नगरचे झाले अहिल्यानगर, केंद्र सरकारकडून जिल्ह्याच्या नामांतराला मंजुरी

नगरचे झाले अहिल्यानगर, केंद्र सरकारकडून जिल्ह्याच्या नामांतराला मंजुरी

नगर जिल्ह्याचे नामांतर आता अहिल्यानगर झाले आहे. केंद्र सरकारने या नामांतराला मंजुरी दिली आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक्सवर पोस्ट करून ही माहिती दिली आहे.

औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशीव करावे अशी मागणी होती. तसेच अहमदनगरचे नाव बदलून अहिल्यानगर करावे अशीही मागणी होती. औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नामांतर झाल्यानंतर नगरचे नामांतर झाले नव्हते. आता केंद्र सरकारने मंजुरी दिल्यानंतर जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर करण्यात आले आहे. जिल्ह्याचे नाव बदलल्यानंतर रेल्वे स्थानकाचे नावही बदलण्यात येणार आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एका पत्रकार परिषदेत रेल्वे स्थानकाचे नाव बदलले जाईल, अशी माहिती दिली होती.

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

दयाबेनला बिग बॉसकडून मिळत होते तब्बल 65 कोटी, दिशा वकानी हिने तरीही… दयाबेनला बिग बॉसकडून मिळत होते तब्बल 65 कोटी, दिशा वकानी हिने तरीही…
दयाबेन अर्थात दिशा वकानी हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. तारक मेहता मालिकेत दिशा वकानी ही...
पत्नीची ‘ही’ अवस्था पाहून अभिनेत्याने थेट घेतला हा अत्यंत मोठा निर्णय, कधीच आयुष्यात…
ठरलं! या तारखेला हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात करणार प्रवेश
Mega Block News – मुंबईत मध्य आणि हार्बर रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा
सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी पश्चिम रेल्वेवर दहा तासांचा मेगाब्लॉक, अनेक गाड्या रद्द
Navratri Utsav 2024 – श्री विठ्ठलास अलंकार, रूक्मिणी मातेस पारंपरिक लमाणी पोषाखासह अलंकार परिधान
तरुणीला गुंगीचे औषध पाजून ब्लॅकमेल करणार्‍या बिल्डर पुत्राची निर्घृण हत्या, मुलीच्या मित्राने काढला काटा