प्रसादाच्या लाडूत चरबीचे तेल मिसळणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, मंदिर महासंघाची मागणी

प्रसादाच्या लाडूत चरबीचे तेल मिसळणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, मंदिर महासंघाची मागणी

श्री तिरुपती देवस्थानच्या प्रसादात प्राण्यांच्या चरबीचे तेल मिसळणे, हे हिंदूंना धर्मभ्रष्ट करण्याचे षङ्यंत्र रचले गेले आहे. असे महापाप करणाऱ्यांवर धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हे दाखल करून तत्काळ अटक करा, अशी मागणी महाराष्ट्र मंदिर संघाच्या वतीने करण्यात आली. यासाठी बिनखांबी गणेश मंदिर येथे आज आंदोलन करण्यात आले.

जगभरातील कोटय़वधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादाच्या लाडूमध्ये प्राण्यांच्या चरबीचा वापर केला जात असल्याची गंभीर बाब आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी उघड केल्यावर हिंदू समाजामध्ये संतापाची लाट उसळली आहे. ही केवळ भेसळ नसून, हिंदूंच्या धर्मश्रद्धेवर जाणीवपूर्वक केलेला धार्मिक आघात आहे.

माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांचे वडील सॅम्युअल राजशेखर रेड्डी हे मुख्यमंत्री असताना तिरुपती बालाजी मंदिरात लाडू बनवण्याचे कंत्राट एका समाजाच्या संस्थेला देण्यात आले होते. तसेच मंदिराच्या विश्वस्तपदी अन्य धर्मीयांच्या व्यक्तींना नेमले गेले होते. मंदिर परिसरात मिशनऱयांच्या धर्मांतराला प्रोत्साहन दिले गेले. अशी अनेक पापे त्या काळात करण्यात आल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. यावेळी रामभाऊ मेथे, संतोष लाड, किशोर घाटगे, किरण दुसे, अभिजीत पाटील, राजू यादव, गजानन तोडकर, शरद माळी, आनंद पवळ, किरण कुलकर्णी उपस्थित होते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

साहेब आमचे दैवत… अजित पवार गटाच्या नेत्याकडून शरद पवारांचं तोंडभरून कौतुक; मनात नेमकं काय? साहेब आमचे दैवत… अजित पवार गटाच्या नेत्याकडून शरद पवारांचं तोंडभरून कौतुक; मनात नेमकं काय?
राज्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. अशात राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. नरहरी झिरवळ यांचे पुत्र गोकुळ झिरवळ हे शरद...
धनगर आरक्षणाचा जीआर काढला तर मुंबईचं पाणी बंद करू, कुणी दिला इशारा ?
Aishwarya Rai: 80 वर्षांची झाल्यावर कशी दिसेल ऐश्वर्या राय? सुरकुत्या पडूनही सौंदर्य असेल कायम
Aishwarya Rai : नणंद-भावजयीत विस्तव जात नाही.. श्वेता-ऐश्वर्यामध्ये काय बिनसलं ? बच्चन कुटुंबात काय घडतंय ?
‘नवरा माझा नवसाचा 2’ची ट्रेन सुसाट; तीन दिवसांत कमावले इतके कोटी रुपये
प्रसादाच्या लाडूत चरबीचे तेल मिसळणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, मंदिर महासंघाची मागणी
खंबाटकी घाटात थरार, भरधाव कंटेनरने दहा गाडय़ांना उडविले