कामाच्या अतिताणामुळे इंजिनीयरची विजेचा शॉक घेऊन आत्महत्या

कामाच्या अतिताणामुळे इंजिनीयरची विजेचा शॉक घेऊन आत्महत्या

चेन्नईत एका इंजिनीयर तरुणाने कामाच्या अतिताणाने आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे. गेल्या काही दिवसांपासून कामाच्या अतिताणामुळे आत्महत्या करणाऱ्यांचे किंवा मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसत आहे. मूळचा तामीळनाडूमधील थेनी जिह्यातील कार्तिकेयन त्याच्या पत्नी आणि दोन मुलांसह चेन्नईतल राहत होता. त्याला 10 आणि 8 वर्षांची दोन मुले आहेत. गेल्या 15 वर्षांपासून तो एका सॉफ्टवेअर कंपनीत तंत्रज्ञ म्हणून काम करत होता. विजेचा शॉक घेऊन कार्तिकेयनने जीवन संपवले.

कार्तिकेयन नैराश्यात गेल्याने त्याच्यावर उपचारही सुरू होते. घटनेच्या वेळी तो एकटाच घरी होता. त्याची पत्नी के. जयरानी सोमवारी चेन्नईपासून 300 किमी अंतरावरील विरुनाल्लूर मंदिरात गेली होती. रात्री ती घरी परतली. तेव्हा कार्तिकेयनचा मृतदेह दिसला. त्याने शरीराभोवती करंट असलेली वायर गुंडाळून आत्महत्या केल्याचे समोर आले.

पुण्यात सीए तरुणीचा मृत्यू

अन्सर्ट अँड यंग या बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्या सीए तरुणीचा अतिताणामुळे मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे. याप्रकरणी केंद्रीय कामगार मंत्रालयाने चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अॅना सेबास्टियन रेरायिल (26) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

तस्करी करणाऱ्या तिघांना अटक  तस्करी करणाऱ्या तिघांना अटक 
सोने आणि घडय़ाळ, हिरे तस्करीप्रकरणी सीमा शुल्क विभागाने गुन्हे नोंद केले. गुन्हे नोंद करून एपूण तिघांना अटक केली. छत्रपती शिवाजी...
खंबाटकी घाटात थरार भरधाव कंटेनरने दहा गाड्यांना उडविले, 12 प्रवासी जखमी
शिक्षणाचा हक्क हा आनंदी जगण्याचा मंत्र, हायकोर्टाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण
गद्दार आमदारांच्या अपात्रतेचा फैसला कधी? शिवसेनेच्या याचिकेवर उद्या सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी
ठाण्याच्या शौर्याची सुवर्ण धाव, राज्य अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत दमदार कामगिरी
तोच संघ कायम, कानपूर कसोटीत राहुलऐवजी सरफराजच्या नावाची चर्चा
बांगला वाघांची शिकार, साडेतीन दिवसांतच हिंदुस्थानी वाघांकडून बांगलादेशचा खात्मा; 280 धावांच्या विजयासह मालिकेत घेतली आघाडी