तोच संघ कायम, कानपूर कसोटीत राहुलऐवजी सरफराजच्या नावाची चर्चा

तोच संघ कायम, कानपूर कसोटीत राहुलऐवजी सरफराजच्या नावाची चर्चा

बांगलादेशचा साडेतीन दिवसांत खात्मा केल्यानंतर हिंदुस्थानी संघात बदलाची अपेक्षा नव्हतीच आणि निवड समितीने तोच 16 सदस्यीय संघ येत्या 27 सप्टेंबरपासून कानपूर कसोटीसाठीही कायम ठेवला आहे. चेन्नई कसोटीत हिंदुस्थानच्या आघाडीच्या फलंदाजांनी घोर निराशा केली होती. त्यात कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि के. एल. राहुल हेच तीन फलंदाज आहेत, ज्यांना दोन्ही डावांत काहीही करता आले नव्हते. दुसऱ्या कसोटीसाठी निवड समितीने 16 सदस्यीय संघ कायम ठेवला असला तरी अंतिम 11 खेळाडूंत के. एल. राहुलऐवजी सरफराज खानला संधी मिळणे अपेक्षित आहे. राहुलला दोन्ही डावांत फलंदाजीची संधी मिळाली होती, पहिल्या डावात तो 16 धावांवर बाद झाला, तर दुसऱ्या डावात तो 22 धावांवर नाबाद राहिला. सरफराजने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेद्वारे कसोटी पदार्पण करताना 5 डावांपैकी 3 डावांत अर्धशतके ठोकली होती. तरीही त्याला चेन्नई कसोटीत स्थान मिळाले नव्हते. त्यामुळे कानपूर कसोटीत राहुलऐवजी सरफराजच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. वेगवान गोलंदाजीतही मोहम्मद सिराज आणि आकाश दीप यांची कामगिरी समाधानकारक असल्यामुळे दोघांपैकी एकाला वगळून यश दयालला पदापर्णाची संधी मिळण्याची शक्यता कमीच आहे.

दुसऱ्या कसोटीसाठी हिंदुस्थान संघ

रोहित शर्मा (कर्णधार), गिल, जैसवाल, कोहली, राहुल, सरफराज, जाडेजा, पंत, जुरेल, अश्विन, पटेल, यादव, सिराज, बुमराज, आकाश दीप, यश दयाल.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

साहेब आमचे दैवत… अजित पवार गटाच्या नेत्याकडून शरद पवारांचं तोंडभरून कौतुक; मनात नेमकं काय? साहेब आमचे दैवत… अजित पवार गटाच्या नेत्याकडून शरद पवारांचं तोंडभरून कौतुक; मनात नेमकं काय?
राज्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. अशात राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. नरहरी झिरवळ यांचे पुत्र गोकुळ झिरवळ हे शरद...
धनगर आरक्षणाचा जीआर काढला तर मुंबईचं पाणी बंद करू, कुणी दिला इशारा ?
Aishwarya Rai: 80 वर्षांची झाल्यावर कशी दिसेल ऐश्वर्या राय? सुरकुत्या पडूनही सौंदर्य असेल कायम
Aishwarya Rai : नणंद-भावजयीत विस्तव जात नाही.. श्वेता-ऐश्वर्यामध्ये काय बिनसलं ? बच्चन कुटुंबात काय घडतंय ?
‘नवरा माझा नवसाचा 2’ची ट्रेन सुसाट; तीन दिवसांत कमावले इतके कोटी रुपये
प्रसादाच्या लाडूत चरबीचे तेल मिसळणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, मंदिर महासंघाची मागणी
खंबाटकी घाटात थरार, भरधाव कंटेनरने दहा गाडय़ांना उडविले