पंतप्रधान मोदी राहुल गांधींना घाबरले; काँग्रेस नेते चेनिथल्ला यांचा भाजपवर हल्ला

पंतप्रधान मोदी राहुल गांधींना घाबरले; काँग्रेस नेते चेनिथल्ला यांचा भाजपवर हल्ला

‘भारत जोडो’ यात्रेत राहुल गांधींनी संपूर्ण देश पिंजून काढला. ठिकठिकाणी जनतेने त्यांना उदंड प्रेम दिले. याचाच दणका भाजपला लोकसभा निवडणुकीत बसला. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी राहुल गांधींना घाबरले असून त्यांना बदनाम करण्याचा घाट घातला आहे, असा हल्लाबोल आज काँग्रेसचे महाराष्ट्र पक्ष निरीक्षक रमेश चेनिथल्ला यांनी भाजपवर केला. वाढती महागाई, भ्रष्टाचार आणि देशातील माजलेल्या अराजकतेविरोधात चेनिथल्ला यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीकेची झोड उठवली.

काँग्रेसची कोकण विभागीय बैठक आज भाईंदर पश्चिमेच्या मॅक्सेस मॉलमध्ये पार पडली. यावेळी माजी आमदार मुइझफर हुसेन, माजी खासदार हुसेन दलवाई, जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत, प्रवक्ते प्रकाश नागणे, अनिल सामंत, राजीव मेहरा, जुबेर इनामदार, रूपा पिंटो महिला जिल्हाध्यक्ष, युवा काँग्रेसचे सिद्देश राणे, युवक अध्यक्ष कुणाल काटकरसह हजारो कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

नितेश राणे छोटा माणूस.. दंगलींसाठी भाजपची धडपड

काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, नितेश राणे छोटा माणूस आहे. त्यांना पुढे करून काहीजण दंगली घडवण्याची धडपड करत आहेत, असा आरोप त्यांनी केला.

शेतकऱ्यावर सूडबुद्धीने गुन्हे

सोयाबीनला भाव मिळत नसल्याने बुलढाण्यातील शेतकऱ्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रक्ताने पत्र लिहून पाठवले. त्यामुळे तिळपापड झालेल्या सरकारने या शेतकऱ्यावर सूडबुद्धीने खोटे गुन्हे दाखल केले. अशा प्रकारे अनेक ठिकाणी अन्नदात्या बळीराजाची गळचेपी सुरू आहे. या पापाची परतफेड भाजप-मिंधे गटाला विधानसभा निवडणुकीत चुकवावी लागेल, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला. नितेश राणे पोलिसांना खुलेआम शिव्या देतात. हिंदू-मुस्लिमांमध्ये भांडणे लावण्याचे उद्योग सुरू असताना पोलीस शांत आहेत. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या भडकावू भाषणे देणाऱ्यांवर कारवाई का करत नाहीत? त्या भाजपचे तर काम करत नाहीत ना, असा सवाल पटोले यांनी केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Narhari Zirwal: सत्ताधारी आमदारांनी मंत्रालयाच्या जाळीवर मारल्या उड्या…काय आहे कारण Narhari Zirwal: सत्ताधारी आमदारांनी मंत्रालयाच्या जाळीवर मारल्या उड्या…काय आहे कारण
Narhari Zirwal: राज्याच्या राजकारणात धक्कादायक बातमी आली आहे. सत्ताधारी पक्षात असलेले आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी सीताराम झिरवळ यांच्यासह दोन आमदारांनी...
राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठी मोर्चेबांधणी; विधानसभेपूर्वी कुणाला मिळणार आमदारकी? शिंदे गटाची नावं तर फायनल, भाजप, राष्ट्रवादीत कुणाची वर्णी?
Ashok Chavan : मलाही जिवंत ठेवा मी जिवंत राहिलो तर…माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे काय बोलून गेले, वक्तव्याने एकच खळबळ
‘या’ नेत्याला अभिनेत्रींचं लैंगिक शोषण करण्याची सवय आणि…’, कॅबिनेट महिला मंत्र्याचं धक्कादायक वक्तव्य
‘बिग बॉस मराठी सीजन 5’चा हा स्पर्धेक ठरणार विजेता? अखेर ते नाव फिनालेच्या अगोदरच…
Govinda : गोविंदाला चालणं कठीण, व्हिलचेअरवरून घरी; पत्नी सुनीताने काय सांगितलं?
सूरज चव्हाण याच्यामुळे होणार बिग बॉसच्या घरातील ‘या’ सदस्यावर मोठा अन्याय?, लोकांमध्ये संताप, थेट…