गद्दारांवर विश्वास ठेवला तर विश्वासघातच होतो, आदित्य ठाकरे यांचा टोला

गद्दारांवर विश्वास ठेवला तर विश्वासघातच होतो, आदित्य ठाकरे यांचा टोला

ज्यांना राज्यपाल, मंत्रीपदाचे चॉकलेट दाखवले होते त्या गद्दारांना खेचून, रडून, ओढूनताणून मिंध्यांनी आता महामंडळाचे अध्यक्ष केले आहे. मिंधे राजवटीचे मोजके दिवस शिल्लक राहिले असताना निवडणुकीच्या तोंडावर ही मंडळं देऊन गप्प केले आहे असे सांगत ‘स्वार्थी गद्दारावर विश्वास ठेवाल तर असाच विश्वासघात होतो’, असा सणसणीत टोला शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मिंधे सरकार आणि गद्दार आमदारांना लगावला आहे.

गेल्या अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेशी गद्दारी करून सुरतला पळालेल्या गद्दारांना मिंध्यांकडून राज्यपाल, मंत्रीपदाचे आमिष दाखवले होते. याबाबत संबंधित गद्दारांनी वारंवार आपली ‘हाव’ बोलूनही दाखवली होती. मंत्रीपद मिळेल म्हणून काही गद्दार कोट शिवूनही बसले होते, मात्र सरकारची राजवट संपत आली तरी मंत्रीपद काही मिळाले नाही. तर आता या गद्दारांना महामंडळांच्या अध्यक्षपदी बसवण्याचे प्लॅन मिंधे सरकारकडून सुरू आहे. यावरून आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’वर पोस्ट करीत मिंध्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. ज्यासाठी मिंध्यांनी सुरतला पळून जायला लावले होते, त्या 33 देशांमध्ये गद्दार म्हणून प्रसिद्ध केले, त्यांना निवडणुकीच्या तोंडावर राजवटीचे मोजके दिवस शिल्लक राहिले असताना मंडळं देऊन गप्प केल्याचा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे. हे गद्दार काय स्वप्नं घेऊन पळाले होते, असे सांगतानाच यांचे कौतुकच वाटते, असेही ते म्हणाले आहेत. दरम्यान, मिंधे सरकाकडून गद्दार आमदार भरत गोगावले यांच्यासह दोन आमदारांची महामंडळांच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यावरून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे.

महाराष्ट्राला मागे खेचून भाजपला काय मिळालं?

आदित्य ठाकरेंनी मिंध्यांच्या निर्णयावरून भाजपलाही चांगलेच फटकारले आहे. मिंध्यांकडून गद्दारांना मंडळे दिली जात असताना भाजपला काय मिळालं, असा सवाल करीत हे घडत असताना भाजप कार्यकर्त्यांचे कौतुक वाटते असेही ते म्हणाले आहेत. दोन वर्षांत आमचं सरकार पाडून, पक्ष फोडून, कुठल्या खऱया भाजप कार्यकर्त्यांला काय मिळालं, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. मिंध्यांनी परस्पर पदं देऊन टाकली, आता यांचं काय? असे सांगतानाच महाराष्ट्राला मागे खेचण्यात मिळालेलं यश सोडून भाजपला काय मिळालं? असा थेट सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Bigg Boss Marathi 5:  सूरज चव्हाणचं मोठं सिक्रेट लीक, होणार ‘बिग बॉस’च्या घराचा मालक? Bigg Boss Marathi 5: सूरज चव्हाणचं मोठं सिक्रेट लीक, होणार ‘बिग बॉस’च्या घराचा मालक?
Suraj Chavan Bigg Boss Marathi: ‘बिग बॉस मराठी 5′ च्या घरातील अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांचा प्रवास तब्बल 67 दिवसांनी संपल्यानंतर...
Bigg Boss Marathi 5: ‘प्रवासात मी अनेक आव्हानांचा…’, शोमधून निरोप, वर्षा उसगांवकर झाल्या व्यक्त
मोदी-शहांचे वाढते महाराष्ट्र दौरे आणि सभांवरून शरद पवार यांचा चिमटा; म्हणाले ‘आणखी या’
50 % पर्यंतचे आरक्षण 75% पर्यंत जाऊ द्या! शरद पवार यांचं मोठं विधान
त्यांनी ‘दम मारो दम’ सिनेमा काढावा! स्वबळावर सत्ता स्थापण्याचे स्वप्न बघणाऱ्या भाजपला संजय राऊतांचा सणसणीत टोला
पुणे हादरले… बोपदेव घाट परिसरात तरुणीवर सामूहिक बलात्कार
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळणे हा मोठा सन्मान; संजय राऊत यांची प्रतिक्रिया