महाराष्ट्राला गृहमंत्री आहे की नाही ? आदित्य ठाकरे यांचा फडणवीस आणि मिंध्यांवर घणाघात

महाराष्ट्राला गृहमंत्री आहे की नाही ? आदित्य ठाकरे यांचा फडणवीस आणि मिंध्यांवर घणाघात

पुण्यात आणि राज्यात सातत्याने गुन्हेगारी कारवाया होत आहेत. त्यामुळे राज्याला गृहमंत्री आहे की नाही? असा प्रश्न पडतो. सध्या महाराष्ट्रात गृहमंत्री नाहीच, असं सरकार चाललंय,’ असा घणाघात शिवसेना नेतेयुवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सरकारवर चढवला.

आदित्य ठाकरे यांनी आज पुण्यातील गणपती मंडळांना भेटी देऊन बाप्पाचे दर्शन घेतले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. राज्यातील कायदा-सुव्यवस्थेची स्थिती आणि पुण्यात गेले काही दिवस सलग गोळीबाराच्या होत असलेल्या घटना, त्याचबरोबर राहुल गांधी यांच्याविरोधात आमदार संजय गायकवाड यांनी आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल विचारले असता, आदित्य ठाकरे म्हणाले, यापूर्वीही गायकवाड यांनी अशी अनेक आक्षेपार्ह विधाने केली आहेत. मात्र, या राज्यामध्ये गृहमंत्री नेमलाच नाही, असे सध्याचे चित्र आहे. बदलापूर घटनेमध्येदेखील वामन म्हात्रे यांच्यावर कारवाई करण्यात आलेली नाही. मात्र, तक्रार करणाऱया महिला पत्रकारावर गुन्हा दाखल करण्यात आल्याबद्दल आदित्य ठाकरे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मिंधे सरकारला फटकारले.

महाविकास आघाडीच्या जागावाटपाबद्दल बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, ‘महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबतची चर्चा वरिष्ठ पातळीवर सुरू असून, त्याबाबत लवकरच चित्र स्पष्ट होईल. पुण्यामध्ये उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्री म्हणून पोस्टर्स लावण्यात आलेले आहेत. त्याबाबत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, ‘उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून जे दोन अडीच वर्षांमध्ये काम केले ते लोकांसमोर आहे. त्यामुळे त्याबाबत जनता निर्णय घेईल. मात्र, ही निवडणूक आम्ही आमच्यासाठी अथवा कोणत्याही पदासाठी लढत नसून, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढत आहोत.’

मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण, हे महाराष्ट्र ठरवेल!

‘आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरवेल. जनतेला सर्वांचं काम माहीत असून, महाराष्ट्राला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचेदेखील काम माहीत आहे,’ असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. ठाण्यातील ‘आनंद आश्रम’मध्ये मिंध्यांकडून पैसे उधळले गेल्याबद्दल आदित्य ठाकरे म्हणाले, ‘आश्रमात घडले ते फारच वाईट आहे. मिंधे आतापर्यंत आतमध्ये करत होते, आता ते बाहेर करत आहेत. सगळीकडे पैशांची अशीच उधळपट्टी सुरू आहे.’ पुण्यातील महाविकास आघाडीच्या फॉर्म्युल्याबद्दल आदित्य ठाकरे यांनी, ‘पुण्यात जिंकणारच हा आमचा फॉर्म्युला आहे,’ असे सांगितले.

महायुतीचा चेहरा भ्रष्ट आणि गद्दारांचा

आदित्य ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण?असा थेट सवाल केला. ‘महायुतीकडूनदेखील चेहरा जाहीर करण्यात आलेला नाही. सध्या असलेला भ्रष्ट, खोके आणि गद्दारांचा चेहराच घेऊन आगामी विधानसभा निवडणुकीला ते सामोरे जाणार आहेत का? अथवा चेहरा बदलणार आहेत?’ अशी खिल्ली त्यांनी उडवली.

जे पाहिजे असतं ते देवाला माहीत असतं!

‘दरवर्षीप्रमाणे यंदाही दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतले. मी जेव्हा जेव्हा देवाचे दर्शन घेतो, तेव्हा त्याच्याकडे काहीच मागत नाही. आपल्याला जे पाहिजे असतं, ते देवाला माहीत असतं. त्यामुळे मी फक्त देवाला मनापासून नमस्कार करतो,’ असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

भाजपमध्ये मोठं काहीतरी घडतंय, अमित शाह मुंबईत, फडणवीसांचा कार्यकर्त्यांना हुंकार, रात्री खलबतंही होणार भाजपमध्ये मोठं काहीतरी घडतंय, अमित शाह मुंबईत, फडणवीसांचा कार्यकर्त्यांना हुंकार, रात्री खलबतंही होणार
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप पक्ष चांगलाच कामाला लागला आहे. भाजपचे महाराष्ट्रातील नेते विधानसभा निवडणुकीची तयारी करत असतानाच आता केंद्रीय...
मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात या तारखेपासून बदल, पाहा काय घेतला निर्णय
शिवाजी पार्क ठाकरेंचेच, मुंबई की ठाणे? शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचं नवं ठिकाण ठरलं?
देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी ‘मातोश्री’वर एकटेच गेले, राऊत अन् नड्डांचीही झाली भेट, राज्याच्या राजकारणात या गौप्यस्फोटाने खळबळ
मुंबईतील रुग्णालयात विद्यार्थीनीचा लैंगिक छळ, मुख्यमंत्र्यांकडून डीनच्या बदलीचे आदेश, चौकशी समिती गठीत
“नायर रुग्णालयाची वाटचाल कोलकाताच्या दिशेने…”, लैंगिक छळाच्या तक्रारींवरून मनसे आक्रमक, म्हणाले “नंतर एन्काऊंटर करण्यापेक्षा…”
अमित शाह मुंबईत आले… भाषणापूर्वी कार्यकर्त्यांना काय भरला दम?; इन्साईड स्टोरी काय?