देशातील चांगल्या-वाईटांसाठी हिंदूच जबाबदार, मोहन भागवत यांचे विधान
देशात काही चांगले घड़ले तर हिंदू समाजाची कीर्ती वाढते. पण काही चूक झाली तर त्याची जबाबदारीही हिंदू समाजावर पडते. कारण ते या देशाचे कर्तेधर्ते आहेत, असे विधान सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे. ज्याला आपण हिंदू धर्म म्हणतो तो खरा मानवधर्म आहे. हा जागतिक धर्म आहे आणि तो सर्वांच्या कल्याणाची इच्छा व्यक्त करतो, असेही भागवत म्हणाले.
मोहन भागवत सध्या अलवर दौऱयावर आहेत. शहर संचालनालयाच्या पहिल्या दिवशी इंदिरा गांधी स्टेडियममध्ये ते बोलत होते. काwटुंबिक मूल्यांबाबतही त्यांनी या वेळी चिंता व्यक्त केली. देशात काwटुंबिक मूल्ये धोक्यात आहेत. माध्यमांच्या गैरवापरामुळे नवी पिढी आपली मूल्ये झपाटय़ाने विसरत चालली आहे. हा चिंतेचा विषय आहे, असेही भागवत म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List