ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक जागा जिंकणार; संजय राऊत यांचा शंखनाद

ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक जागा जिंकणार; संजय राऊत यांचा शंखनाद

लोकसभा निवडणुकीसाठी मिंधे गटाने गुरुवारी 8 उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यात ठाणे, कल्याण, पालघर आणि नाशिक मतदारसंघांचा समावेश नाही. हे मतदारसंघ आपल्याला मिळावेत यासाठी भाजपने मिंधे गटावर वेगवेगळ्या मार्गाने दबाव आणला आहे. यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली. “गटातटाचे जे राजकारण सुरू आहे किंवा भाजपचे जे मांडलिक, गुलाम आहे त्यांच्याविषयी आता काही बोलण्यासारखे राहिलेले नाही. राजन विचारे हे ठाण्यातून आमचे उमेदवार असून त्यांचे नाव जाहीर झाले आहे. पालघर आणि कल्याण-डोंबिवलीचे उमेदवार उद्या जाहीर होतील. ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक जागा आम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही”, असा शंखनाद राऊत यांनी केला.

शुक्रवारी सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना खासदार Sanjay Raut म्हणाले की, राजन विचारे हे शिवसेनेचे ठाण्यातील उमेदवार असून त्यांचे नावही जाहीर झाले आहे. त्यामुळे दुसरा गट शिवसेना म्हणून भाजपबरोबर व्यवहार करत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि पालघर या ठाणे जिल्ह्यातील जागा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना लढणार आहे. असली शिवसेना बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांची असून आम्ही आमचे उमेदवारही जाहीर केले आहेत. ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि पालघरही आम्ही जिंकू. ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक जागा शिवसेना जिंकल्याशिवाय राहणार नाही. मी असली शिवसेनेविषय बोलत असून डुप्लिकेट शिवसेनेबाबत नाही, असा टोलाही राऊत यांनी लगावला.

जागावाटपाबाबत मिंधे गट अद्यापही वेटिंगवर असल्याबाबत विचारले असता राऊत म्हणाले की, “काही दिवसांपासून ते दिल्लीत वेटिंगवरच आहेत. भाजप नेत्यांच्या लॉनवर त्यांना रुमाल टाकून बसावे लागतेय. काही दिवसांनी सत्तेत परिवर्तन होईल तेव्हा सगळे वर्षा बंगल्याबाहेर वेटिंगवर दिसतील.”

दरम्यान, 3 एप्रिल रोजी मुंबईतील शिवालय येथे महाविकास आघाडीची पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण आणि इतर सर्व घटकपक्षांचे नेते उपस्थित राहतील. तसेच 31 तारखेला दिल्लीतील रामलीला मैदानावर इंडिया आघाडीची महारॅली होणार आहे. या महारॅलीला महाराष्ट्रातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही उपस्थित राहणार असल्याची माहिती राऊत यांनी दिली.

वंजित बहुजन आघाडीबाबत प्रश्न विचारला असता राऊत म्हणाले की, “संविधान वाचवण्याची जबाबदारी या देशातील प्रत्येक नागरिकाची आहे. आम्ही आमचे कर्तव्य पार पाडत आहोत. आंबेडकरांनाही याबाबत आवाहन केले आणि त्यांच्याशी चर्चाही केली. संविधानाच्या पाठीत खंजीर खुपणाऱ्यांच्या बाजुने, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे ते उभे राहणार नाहीत याची आम्हाला खात्री आहे. ते आंबेडकर आहेत आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा ते घेऊन पुढे निघाले आहेत आणि आम्ही त्यांच्याबरोबर आहोत.”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Maharashtra News LIVE : शरद पवार विठ्ठलाच्या चरणी, पंढरपुरात घेतले दर्शन Maharashtra News LIVE : शरद पवार विठ्ठलाच्या चरणी, पंढरपुरात घेतले दर्शन
निवडणूक आयोगाकडे सर्वोच्च न्यायालयाने विचारणा केली आहे. उमेदवारांपेक्षा नोटाला जास्त मते मिळाल्यास त्या मतदारसंघातला निवडणूक निकाल रद्द करून नव्याने मतदान...
महाराष्ट्रात ओबीसी विरुद्ध मराठा; देशात अनेक जागांवर जातींमध्ये लढाई
भाजपच्या गोदामात सगळे भ्रष्टाचारी आणि माफिया; अखिलेश यादव यांचा मोदी सरकारवर जोरदार हल्ला
साईराज ’अप्पी आमची कलेक्टर’ मालिकेत
भाजपला देशवासीयांना गुलाम बनवायचे आहे; अलिबागमध्ये इंडिया आघाडीचा मेळावा
Lok Sabha Election 2024 : भाजपच्या गोयल यांना मासळीचा वास सोसवेना; कार्यकर्त्यांची महिला पत्रकाराला धमकी
धूर-धुळीमुळे मुंबईत प्रदूषण