T-20 World Cup 2024 : विराटमध्ये 40 चेंडूंमध्ये शतक ठोकण्याची क्षमता, सौरभ गांगुलीचा टीम इंडियाला महत्वाचा सल्ला

T-20 World Cup 2024 : विराटमध्ये 40 चेंडूंमध्ये शतक ठोकण्याची क्षमता, सौरभ गांगुलीचा टीम इंडियाला महत्वाचा सल्ला

पुढील काही दिवसांमध्ये टीम इंडियच्या संघाची घोषणा केली जाणार आहे. सर्व चाहते तसेच टीम इंडियाचे माजी खेळाडू आगामी विश्वचषकासाठी कोणाची निवड होणार हे पाहण्यासाठी उत्सुक आहेत. अशातच दिल्ली कॅपिटल्सचे क्रिकेट संचालक आणि बीसीआयचे माजी अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी मोठे वक्तव्य केले आहे. खेळाडूंनी न घाबरता खेळले पाहिजे अस म्हणत त्यांनी टीम इंडियाला काही सल्ले दिले आहेत.

दिल्लीमध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये बोलत असताना त्यांनी आगामी टी-20 विश्वचषकासंबंधित वक्तव्य केले. “टी-20 क्रिकेट खेळण्यासाठी वयाचा कोणताच नियम नाही. त्यामुळे टीम इंडियासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे न घाबरता खेळणे. जेम्स अँडरसन अजूनही कसोटी खेळत असून 30 षटके टाकतो. तसेच आजही महेंद्र सिंग धोनी खणखणीत षटकार ठोकतो. विशेष म्हणजे दोघांचेही वय 40च्या वर आहे, ” असे म्हणत टीम इंडियाने न घाबरता खेळले पाहिजे असे सौरभ गांगुलीने म्हटलं आहे.

“टीम इंडियाने आक्रमक खेळ करणे महत्त्वाचे आहे. रोहित, विराट, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या इ. हे सर्व प्रतिभावान खेळाडू असून त्यांच्याकडे षटकार मारण्याची चांगली क्षमता आहे, ” असे म्हणत खेळाडूंनी समतोल साधण्याची गरज असल्याचे सौरभ गांगुलीने म्हटले आहे.

“रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी विश्वचषकामध्ये सलामीला खेळायला हवे. तसेच विराटमध्ये 40 चेंडूंत शतक झळकवण्याची क्षमता आहे, ” असे म्हणत सौरभ गांगुलीने विराट कोहलीवर विश्वास दाखवला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मतदानाआधी पैसे वाटपावरुन आरोप आणि राडे, महाविकासआघाडीचे 5 कार्यकर्ते ताब्यात मतदानाआधी पैसे वाटपावरुन आरोप आणि राडे, महाविकासआघाडीचे 5 कार्यकर्ते ताब्यात
भाजपचे उत्तर पूर्व मुंबईचे उमेदवार मीहिर कोटेचा यांच्या कार्यालयाबाहेर शुक्रवारी रात्री राडा झाला होता. मीहिर कोटेचा यांच्या कार्यालयात पैसे वाटप...
धनंजय मुंडेंचे कार्यकर्ते मला मारण्याची भाषा करत आहेत! मनोज जरांगे यांचा खळबळजनक आरोप
मतदानाचा पाचवा टप्प्याच्या तेरा मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या
महाराष्ट्रातील 5 वा आणि अंतिम टप्प्यातील प्रचार थांबला, सोमवारी मतदान
चार जून नंतर जुमला युग संपणार, उद्धव ठाकरे यांचा घणाघात
पुण्यात पुन्हा एक भलेमोठे होर्डिंग कोसळले, घोडा गंभीर जखमी
एकेकाला का अटक करता, आम्ही सगळेच भाजप मुख्यालयात येतो! अरविंद केजरीवाल यांचे मोदींना आव्हान