लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शिक्षक भरतीला वेग

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शिक्षक भरतीला वेग

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शिक्षक भरतीला वेग आला असून शालेय शिक्षण आयुक्तालयाने ग्राम विकास विभागाच्या प्रधान सचिवांना तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱयांना प्रत्यक्ष मतदान झालेल्या ठिकाणी शिक्षकांच्या नियुक्तीबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी या भरती प्रक्रियेबाबत माहिती दिली आहे.

पवित्र पोर्टलच्या माध्यमातून राबविल्या जात असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेला लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ब्रेक लागला होता. मात्र निवडणूक झालेल्या जिह्यात शिक्षक भरतीची पुढील प्रक्रिया सुरू करण्यास केंद्रीय निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे. त्याबाबत पवित्र पोर्टलवर बुलेटिनदेखील प्रसिद्ध केले असून त्यात जिल्हा परिषदेचे सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना शिक्षक भरतीसंदर्भातील निर्देश दिल्याचे नमूद केले आहे.

पुढील निवड प्रक्रिया लवकरच

पहिल्या फेरीतील कार्यवाही सुरू असतानाच पुढील निवड फेरी घेण्याच्या दृष्टीने सर्व नियमांचे पालन करून प्रशासकीय प्रक्रिया सुरू आहे. पुढील फेरीमधील माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूपंपग्रस्त व तत्सम पदांतील वेगवेगळय़ा घटकांच्या मागण्या विचारात घेता समन्यायी पद्धतीने व शासन निर्णयातील सूचनांचे योग्य ते पालन करून कार्यवाही करण्यात येत आहे, असे शिक्षक भरतीबाबतच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. या सर्व बाबी विचारात घेऊन पुढील निवड फेरीसुद्धा लवकरात लवकर घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत.   

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आधी चिमुरड्याचा गळा चिरला; नंतर डबक्यात बुडवून मारले, 10 वर्षांच्या मुलाच्या हत्येने उरण हादरले आधी चिमुरड्याचा गळा चिरला; नंतर डबक्यात बुडवून मारले, 10 वर्षांच्या मुलाच्या हत्येने उरण हादरले
दहा वर्षीय मुलाच्या निघृण हत्येने उरण हादरले आहे. सुरक्षारक्षकाने लहान मुलांना कंपनीत नो एण्ट्री असल्याचे सांगितल्याने पित्याने मुलाला आपल्या जवळच्या...
ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघरमध्ये महाविकास आघाडीच बाजी मारणार; भाजपच्या जुमल्यांना, गद्दारांना मतदार जागा दाखवणार
डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांची 60 लाखांची फसवणूक; राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नगर जिल्हाध्यक्षांविरुद्ध पकड वॉरंट
शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱयांचा महाविकास आघाडीला पाठिंबा
पैसे वाटपाच्या प्रश्नावर निवडणूक आयोगाचे मौन
लोकलच्या गर्दीत धक्का लागून मृत्यू हा अपघातच! रेल्वे मंत्रालयाला हायकोर्टाचा दणका
पाचव्या टप्प्यातील प्रचार संपला