शहीदांच्या कुटुबीयांसाठी 15 वर्षे अधिवासाची अट नको; हायकोर्टात जनहित याचिका दाखल

शहीदांच्या कुटुबीयांसाठी 15 वर्षे अधिवासाची अट नको; हायकोर्टात जनहित याचिका दाखल

सरकारने शहीद जवानांच्या कुटुंबीयांना सैनिक भत्ता व इतर लाभ देताना 15 वर्षे अधिवासाची अट घालू नये, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली. माहिती अधिकार कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी ही याचिका केली आहे.

संरक्षण दलातील जवान केंद्र सरकारचे कर्मचारी असतात. त्यांच्या कुटुंबीयांना 15 वर्षे अधिवासाची अट लागू होत नाही. शहीद जवानाच्या कुटुंबाला महाराष्ट्रात स्थायिक व्हायचे असेल तर सरकारने त्या कुटुंबाला अधिवासाची अट न घालता सैनिक भत्ता, निवास व इतर लाभ दिले पाहिजेत. जवान देशासाठी बलिदान देतात. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना हक्क नाकारू शकत नाही, असे याचिकेत म्हटले आहे. अलीकडेच मिंधे सरकारच्या असंवेदनशील भूमिकेमुळे मेजर अनुज सूद यांच्या कुटुंबीयांना अडचणींना सामोरे लागले. त्याकडेही न्यायालयाचे लक्ष वेधले आहे. शहिदांच्या कुटुंबीयांना 8 फेब्रुवारी 2007 च्या जीआरनुसार अधिवासाची सूट लागू करावी, अशी विनंती तिरोडकर यांनी केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आधी चिमुरड्याचा गळा चिरला; नंतर डबक्यात बुडवून मारले, 10 वर्षांच्या मुलाच्या हत्येने उरण हादरले आधी चिमुरड्याचा गळा चिरला; नंतर डबक्यात बुडवून मारले, 10 वर्षांच्या मुलाच्या हत्येने उरण हादरले
दहा वर्षीय मुलाच्या निघृण हत्येने उरण हादरले आहे. सुरक्षारक्षकाने लहान मुलांना कंपनीत नो एण्ट्री असल्याचे सांगितल्याने पित्याने मुलाला आपल्या जवळच्या...
ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघरमध्ये महाविकास आघाडीच बाजी मारणार; भाजपच्या जुमल्यांना, गद्दारांना मतदार जागा दाखवणार
डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांची 60 लाखांची फसवणूक; राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नगर जिल्हाध्यक्षांविरुद्ध पकड वॉरंट
शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱयांचा महाविकास आघाडीला पाठिंबा
पैसे वाटपाच्या प्रश्नावर निवडणूक आयोगाचे मौन
लोकलच्या गर्दीत धक्का लागून मृत्यू हा अपघातच! रेल्वे मंत्रालयाला हायकोर्टाचा दणका
पाचव्या टप्प्यातील प्रचार संपला