खराडी-शिरुर तीनमजली उड्डाणपुलाचे काम मार्चपासून, 60 किलोमीटर लांबीच्या प्रकल्पामुळे पुणे-अहिल्यानगर महामार्ग होणार कोंडीमुक्त

खराडी-शिरुर तीनमजली उड्डाणपुलाचे काम मार्चपासून, 60 किलोमीटर लांबीच्या प्रकल्पामुळे पुणे-अहिल्यानगर महामार्ग होणार कोंडीमुक्त

 शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर ऊर्फ माउली कटके यांनी गेल्या काही दिवसांत पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील वाहतूककोंडीच्या समस्येवरती उपाययोजना म्हणून रस्त्यालगतचे अतिक्रमण हटवले आहे. त्यामुळे कोंडीतून वाहनचालकांची काहीशी सुटका झाली आहे. या मार्गावर खराडी बायपास ते शिरूरदरम्यान तीन मजली उड्डाणपूल होणार असून, त्याचे काम मार्चच्या अखेरीस सुरू होणार असल्याचे आमदार कटके यांनी सांगितले.

बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असणाऱ्या केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतील खराडी बायपास ते शिरूर या अत्याधुनिक एलिव्हेटेड उड्डाणपुलाच्या कामास प्रत्यक्षात सुरुवात होण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. राज्यातील पहिला अत्याधुनिक एलिव्हेटेड फ्लायओव्हर प्रकल्प राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे खराडीपासून शिरूरपर्यंत तयार केला जाणार आहे. भूसंपादनापूर्वी शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला ठरवून देणे आदी कामांकरिताचे प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करण्यात आले असून, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम मार्च 2025 मध्ये सुरू करण्याबाबत शासनाने सकारात्मकता दर्शविली आहे, असे आमदार कटके यांनी सांगितले.

मुंबई येथे महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ विभागाचे मुख्य अभियंता रणजीत हांडे यांच्याशी झालेल्या बैठकीत या प्रकल्पाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. शिरूर-हवेली मतदारसंघासाठी महत्त्वाकांक्षी ठरणाऱ्या या 60 कि.मी. लांबीच्या प्रकल्पाची तातडीने सुरुवात करण्याबाबत संबंधित विभागानेही सकारात्मकता दर्शविली आहे. या प्रकल्पाचे मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे ज्यावरून महामेट्रो त्यानंतर दुसऱ्या मजल्यावरून चारचाकी वाहने आणि तळातील रस्त्यावरून अवजड वाहतूक व्यवस्था असणार आहे.

खराडी, लोणीकंद, शिक्रापूर, रांजणगाव आणि शिरूर या पाच ठिकाणी उड्डापुलाला बाह्यमार्ग असणार आहे. या तीन मजली उड्डाणपुलामुळे महामार्गावरील वाहतूककोंडीची समस्या कायमची मार्गी लागणार असल्याचे आमदार कटके यांनी स्पष्ट केले. या प्रकल्पांकरिता भूसंपादनापूर्वी बाधित शेतकऱ्यांशी चर्चा करण्यात येणार आहे. राज्य शासन शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला देणार असून, या कामाला प्रत्यक्षात मार्च महिन्याच्या अखेरीस सुरुवात होणार आहे. हा प्रकल्प मार्गी लागल्यानंतर पुणे शहरातील वाहतुकीवरील ताणही कमी होणार आहे. याबाबत राज्य शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करीत असून, शिरूर-हवेली मतदारसंघातील सर्वात मोठा प्रकल्प मंजूर झाला असल्याचे समाधान आहे, असे आमदार कटके यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Sanjay Raut : सुरेश धसांवर आतापर्यंतचा मोठा आरोप, काय म्हणाले संजय राऊत, तुम्हाला पण बसेल हादरा Sanjay Raut : सुरेश धसांवर आतापर्यंतचा मोठा आरोप, काय म्हणाले संजय राऊत, तुम्हाला पण बसेल हादरा
खासदास संजय राऊत यांनी भाजपाचे आमदार सुरेश धस यांच्यावर जहरी टीका केली आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात न्यायासाठी...
‘छावा’ सिनेमातील ॲक्शन सीनमधील ‘त्या’ चुका, नसतील आल्या कोणाच्या लक्षात…
PVR थिएटरकडून प्रेक्षकाला लाख रुपयांची भरपाई; कारण वाचून व्हाल थक्क!
महाराष्ट्रात छावा चित्रपट ‘टॅक्स फ्री’ होऊ शकत नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले कारण
पेला है मतलब क्या?; अक्षयने घेतली होती रणवीर अलाहबादियाची चांगलीच फरकी, जुना व्हिडीओ व्हायरल
अंगावर काटा, डोळ्यात पाणी आणणारा ‘छावा’चा तो सीन शूट करणारा दिग्दर्शक कोण? ऐकून अभिमान वाटेल
‘सोनं फक्त तळपतच राहिलं तर..’; संघर्षाबद्दल बोलताना ‘छावा’मधील ‘कवी कलश’चा दाटून आला कंठ