Virat vs Anushka: अनुष्का शर्माने विराट कोहलीला केले आउट, संतापलेला विराट म्हणाला, ‘ जा मी नाही खेळत…’

Virat vs Anushka: अनुष्का शर्माने विराट कोहलीला केले आउट, संतापलेला विराट म्हणाला, ‘ जा मी नाही खेळत…’

Virat Kohli vs Anushka Sharma: टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली अन् बॉलीवूड स्टार अनुष्का शर्मा यांच्यात गली क्रिकेटचा सामना रंगला. दोघांमधील या गली क्रिकेटच्या सामन्याचे नियम अनुष्का शर्मा हिने तयार केले. त्या नियमांना विराट सहमती दर्शवतो. या गली क्रिकेटमधील सामन्याचा व्हिडिओ अनुष्का शर्माने तिच्या इंस्टाग्रामवर टाकला आहे. व्हिडिओमध्ये या पती-पत्नीमधील नोकझोक दिसत आहे. तो चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ प्यूमा ब्रँडसाठी बनवला आहे. विराट या ब्रँडचा एम्बेसडर आहे.

अनुष्काने सांगितले नियम

सामना सुरु होण्यापूर्वी अनुष्काने विराट कोहलीला सामन्याचे नियम सांगितले. एक कागद काढत त्यांची लांबलचक यादी वाचून दाखवली. अनुष्का म्हणते, मला विश्वास आहे की मी तुला हरवले. परंतु खेळ माझ्या नियमाप्रमाणे खेळला जाईल. विराट त्याला सहमती दर्शवतो. मग अनुष्का नियम वाचून दाखवते. अनुष्का शर्मा म्हणते, बॉल तीन वेळा मिस झाली तर आऊट होणार. बॉल तीन वेळा शरीराला लागला तर आऊट होणार…ही नियम ऐकून विराट थोडा रागात येतो. मग अनुष्का म्हणते, राग केला तरी फलंदाज आऊट. मग विराट अनुष्काला बॉलिंग करण्याचे सांगतो. तेव्हा अनुष्का म्हणते, ज्याची बॅट त्याची पहिली बॅटींग.

जो बॉल मारणार आहे, तो बॉल आणणार

अनुष्का बॅटींग करु लागते. तेव्हा पहिल्याच बॉलवर विराट तिला आऊट करतो. मग अनुष्का म्हणते, पहिला चेंडू ट्रॉयल असणार आहे. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर विराट अनुष्काला बाद करतो. विराट बॅटींगला येताच जोरदार शॉट खेळतो. मग अनुष्का म्हणते, आणखी एक नियम आहे. जो बॉल मारणार आहे, तो बॉल घेऊन येईल. मग जेव्हा विराट लांब उभा असतो, तेव्हा अनुष्का तिला बाद करते.

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

विराट कोहली या सामना दरम्यान राग काढतो. मग अनुष्का म्हणते, नियम आठवा, जो राग काढले, तो आऊट. मग विराट बॅट जमिनीवर आपटतो अन् निघतो. तो म्हणतो…’भाड़ में जाए गेम, हट्ट!’ हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. त्याला अनेक लाईक अन् कमेंट मिळाल्या आहेत.

नुकताच झालेल्या भारत बांगलादेश कसोटी मालिकेत भारताने बांगलादेशला 2-0 असे क्लीन स्वीप केले. त्या संघात विराट कोहली खेळत होता. पहिल्या सामन्यात विराटचे प्रदर्शन चांगले झाले नाही. त्यानंतर कानपूर कसोटीत विराटने जोरदार पुनरागमन केले होते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

एका झटक्यात होणार कॅन्सरचे निदान, IIT कानपुरने तयार केले डीव्हाईस एका झटक्यात होणार कॅन्सरचे निदान, IIT कानपुरने तयार केले डीव्हाईस
आता कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराचे जर झटपट निदान झाले तर उपचार लवकर सुरु करता येतात आणि रुग्णाचे प्राण वाचविणे शक्य...
मिंधे सरकार हे महिलाविरोधी सरकार, पुणे प्रकरणावरून नाना पटोले यांची टीका
मुंबईचा वंडर बॉय आणि Team India चा कर्णधार रोहित शर्मा इथेही अव्वल, विराटचा कोहलीचा विक्रम मोडला
Israel Palestine Conflict – तीन महिन्यांपूर्वी हमासच्या तीन प्रमुख नेत्यांना संपवलं, इस्त्रायलचा मोठा दावा
Central Railway Update – मध्य रेल्वेचे नवीन वेळापत्रक, कळवा-मुंब्रा वासियांसाठी गुड न्यूज
मेहकर येथे शिवसेनेचा गद्दार व शासनाच्या विरोधात विक्रमी मोर्चा
आधी भाजप उमेदवारासाठी प्रचार, मग तासाभरात काँग्रेस प्रवेश