सिनेट निवडणुकीवरून आशिष शेलारांचा ठाकरे गटावर हल्लाबोल; म्हणाले, राजकीय बोळवण….

सिनेट निवडणुकीवरून आशिष शेलारांचा ठाकरे गटावर हल्लाबोल; म्हणाले, राजकीय बोळवण….

मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक मागच्या वर्षभरात दोनदा पुढे ढकलण्यात आली. यावरून चर्चांना उधाण आहे. भाजपचे नेते आशिष शेलार यांनी सिनेट निवडणुकीवर बोलताना शिवसेना उद्धव ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. सिनेटच्या उद्या हाऊ घातलेल्या निवडणुका अराजकीय व्हाव्यात, अशी भाजपची इच्छा आहे. जे उमेदवार ठाकरे गटाने दिलेत ते विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी आहेत का? सगळ्या निवडणुकीची राजकीय बोळवण केली आहे. ठाकरे गटाचे उमेदवार मालकाचे हित जोपासणारे, त्यांच्याकडून निवडणूक प्रक्रियेला हरताळ फासलं जात आहे, असं आशिष शेलार म्हणाले.

सिनेट निवडणुकीवर आशिष शेलार काय म्हणाले?

मुंबई विद्यापीठाच्या कामकाजामध्ये लोकशाही प्रक्रियेमध्ये ज्याचं स्थान आहे, अशी असलेली अधिसभा ज्याला आपण सिनेट निवडणूक म्हणतो. त्या सिनेट निवडणुकीबाबत बोगस मतदार नोंदणी झाली. तेव्हाही आम्ही आक्षेप घेतला. आधी नोंदवले गेलेले पदवीधर सेनेच्या शाखेतून निर्माण केलेले पदवीधर होते. निवडणुकीत राजकीय पक्षाचे झेंडे दिसू नयेत अशी कुलगुरूंना विनंती आहे. अभाविप विद्यार्थ्यांसाठीची एकमेव संघटना या निवडणुकीत आहे. त्यांना मुद्दा मांडण्याचा अधिकार आहे. अभाविपच्या मताशी भाजप सहमत नाही, असंही आशिष शेलार म्हणालेत.

अजित पवार यांनी महायुतीतून बाहेर काढण्यासाठी भाजप आणि शिवसेना शिंदे चक्रव्यूह रचत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. यावरही आशिषे शेलारांनी भाष्य केलं आहे. ही कपोलकल्पित बातमी आहे. भाजप शिंदे सेना आणि अजितदादांचा सामना करण्याची ताकद महाविकास आघाडी हरवून बसली आहे. खोट्या बातम्यांचं राजकीय षडयंत्र रचलं जात आहे. जेव्हा उद्धव ठाकरे दिल्लीहून आले आणि मेळाव्यात मुख्यमंत्री पदाबाबत भूमिका घेतली. तेव्हाच काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीने वेळ पडली तर ठाकरे सेनेला सोडून निवडणूक लढण्याची तयारी केली आहे, असं आशिष शेलारांनी म्हटलं आहे.

मविआवर निशाणा

नाना पटोले हेच राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत, असं काँग्रेसच्या नेत्यांकडून म्हटलं जात आहे. काँग्रेस नेते विकास ठाकरे यांनी याबाबतचा दावा केला आहे. त्यावर आशिष शेलारांनी प्रतिक्रिया दिली आहे. मविआतील पक्षांना मुख्यमंत्रिपदाची स्वप्न पडू लागली आहेत. महाराष्ट्रातील मतदार हे पाहतोय. महाराष्ट्र हिताबाबत यांना चिंता नसून मुख्यमंत्रिपदाचा हव्यास लागला आहे. मुख्यमंत्रिपदाचा भसम्या मविआतील तिन्ही नेत्यांना झाला आहे, असं आशिष शेलार म्हणाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सलमान खान सोबत भिडण्याची ताकद ऐश्वर्यामध्येच होती – प्रसिद्ध अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य सलमान खान सोबत भिडण्याची ताकद ऐश्वर्यामध्येच होती – प्रसिद्ध अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य
अभिनेता सलमान खान याचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडण्यात आलं. पण कोणत्याच अभिनेत्रीसोबत भाईजानचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. सलमान खान याच्या...
अशोक सराफ यांचं छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक; झळकणार नव्या मालिकेत
सना खानने 7 वर्षांनी लहान मौलानाशी लग्न का केलं? अखेर केला खुलासा
17 वर्षांच्या करियरमध्ये 450 सिनेमे, आजही अभिनेत्रीच्या मृत्यूचं रहस्य गुलदस्त्यात, घटना धक्क करणारी
दुसऱ्या लग्नानंतर अभिनेत्रीच्या आयुष्यात मोठे वादळ, रडत म्हणाली, माझ्या मुलाला…
Oscars 2025 – ‘लापता लेडीज’ या सिनेमाची ऑस्कर 2025 मध्ये धमाकेदार एन्ट्री; ‘या’ श्रेणीत मिळाले नामांकन
देशातील 20 नद्या एकमेकींना जोडणार; ‘नाम’च्या वर्धापनदिन कार्यक्रमात केंद्रीय मंत्री पाटील यांची माहिती