तिरुपती लाडूचा वाद चिघळला, माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून केला आरोप

तिरुपती लाडूचा वाद चिघळला, माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून केला आरोप

वायएसआर काँग्रेस सरकारच्या काळामध्ये तिरुपती मंदिरात प्रसादाचे लाडू बनवण्यासाठी प्राण्यांची चरबी मिसळली जात होती असा गंभीर आरोप मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला होता. त्यांच्या या आरोपानंतर देशभरात खळबळ उडाली आणि राजकारण चांगलेच तापले. आता यावर वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी संताप व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून एन चंद्रबाबू नायडू तिरुमाला तिरुपती देवस्थानमची प्रतिमा मलिन करत असल्याचा आरोप केला आहे.

जगन मोहन रेड्डी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहीलेल्या पत्रात म्हंटले आहे की, चंद्राबाबू नायडू यांना खोटं बोलायची सवय आहे. ते आपल्या राजकीय फायद्यासाठी कोट्यावधी लोकांच्या आस्थेला धक्का पोहोचवू शकतात. त्यांच्या या खोटं पसरविण्याच्या कृत्यावर कारवाई करुन लोकांसमोर सत्य आणायला हवे. त्यामुळे कोट्यावधी हिंदू भक्तांच्या मनातील संशय दूर होईल आणि तिरुमाला तिरुपती मंदिराचे पावित्र्य कायम राहिल असे त्यांनी पत्रात म्हंटले आहे.

तिरुपती मंदिरात प्रसादाचे लाडू बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तुपात प्राण्यांची चरबी असल्याचा आरोप आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला होता. टीडीपीने दावा केला की, गुजरातमधील प्रयोगशाळेने याला पुष्टी दिली आहे. टीडीपी प्रवक्ते अनम वेंकट रमना रेड्डी यांनी एक पत्रकार परिषद घेत कथित प्रयोगशाळेचा अहवाल दाखवला. त्यांनी दिलेल्या तूपाच्या नमून्यांमध्ये प्राण्यांची चरबी असल्याची पुष्टी केली होती.

केंद्रिय मंत्री प्रल्हाद जोशी आणि गिरीराज सिंह यांनी या प्रकरणाच्या तपासाची मागणी केली आहे. तर केंद्रिय मंत्री जेपी नड्डा यांनी चंद्राबाबू नायडू यांच्याकडून तो अहवाल मागवला आहे. दुसरीकडून अमूलने सोशल मीडियावर सुरू असलेल्या अफवांना फेटाळले आहे. यामध्ये आरोप लावण्यात आले होते की, तिरुमाला तिरुपती देवस्थानमला अमूलकडून तूप पुरवले जाते. आता अमूल कंपनीने आम्ही कधीही टीटीडी ला तूप पुरवले नाही असे स्पष्टीकरण दिले आहे. या वादावर मंत्री आर रामलिंगा रेड्डी यांनी कर्नाटकच्या सर्व मंदिरांना प्रसाद आणि भक्तांना देण्यात येणाऱ्य़ा जेवणाच्या तयारीसाठी केवळ नंदीनी तूपाचा वापर करण्याचे आदेश दिले आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कोट्यवधी संपत्ती असलेला ‘हा’ अभिनेता होणार कपूर खानदानाचा जावई?, इशाऱ्यामध्येच… कोट्यवधी संपत्ती असलेला ‘हा’ अभिनेता होणार कपूर खानदानाचा जावई?, इशाऱ्यामध्येच…
बोनी कपूर यांची लेक खुशी कपूर ही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आलीये. खुशी कपूर हिचा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला...
नेपाळमध्ये हिंदुस्थानी सोशल मिडिया इन्फ्लुएन्सरवर सामुहिक बलात्कार, चार जणांसह दोन नेपाळींना अटक
Nagar News – कोपरगाव-नगर महामार्गावर कंटेनर-दुचाकीचा अपघात, एक ठार; एक गंभीर जखमी
45th Chess Olympiad – हिंदुस्थानने रचला इतिहास; बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये जिंकले पहिले सुवर्ण पदक, स्लोव्हेनियाचा केला पराभव
नगरमध्ये 23 ते 25 सप्टेंबरला जोरदार पावसाचा इशारा, नागरिकांना सतर्कतेचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन
सहावीच्या विद्यार्थ्यावर दंगल आणि हत्येचा गुन्हा दाखल, UP पोलिसांचा अजब कारभार
महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक कधी? निवडणूक आयोगाच्या दौऱ्यानंतर तारीख जाहीर होण्याची शक्यता