‘जगाला युद्ध नको बुद्ध हवाय’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

‘जगाला युद्ध नको बुद्ध हवाय’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

“जगात आज अनेक ठिकाणी संघर्ष आणि युद्धाची परिस्थिती असताना जगाला युद्ध नको बुद्ध हवाय”, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’वर आज रविवारी वर्षावास या पवित्र महिन्यानिमित्त भंतेजींसाठी चिवरदान, धम्मदान आणि भोजनदान सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. “भिक्षू महासंघांच्या राज्यभरातून आलेल्या भंतेजींच्या उपस्थितीने आज ‘वर्षा’वर प्रेमाचा आणि आशिर्वादाचा वर्षाव झाला आहे. गेली दोन वर्ष मुख्यमंत्री नव्हे तर कॉमन मॅन म्हणूनच जनसेवा करत आलोय”, असे मुख्यमंत्री म्हणाले. “अनेक ठिकाणी संघर्षाची परिस्थिती असली तरी जगाला युद्धाची नव्हे तर बुद्धाची गरज आहे. हे आपण आचरणात आणले तर समाज, राज्य आणि देश सुखी झाल्याशिवाय राहणार नाही”, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. “आज ज्ञान जरी खूप असले तरी बुद्धाचे तत्वज्ञान देखील तितकेच आवश्यक आहे”, असेही ते म्हणाले.

“दौलत मिली किसको तो धनवान बन गया, ताकद मिली किसको तो पहलवान बन गया, बाबासाहेब मिले मुझको तो इन्सान बन गया”, अशी रचना सादर करत त्यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रती आदर व्यक्त केला. “राज्याचा कारभार तथागत गौतम बुद्ध यांची शिकवण आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर चालतो”, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

या सोहळ्याची सुरुवात तथागत भगवान गौतम बुद्ध आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादानाने आणि सामूहिक प्रार्थनेने झाली. यावेळी उपस्थितीत आदरणीय भंतेजींना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते चीवरदान, वस्त्रदान करण्यात आले. भंतेजींनी मुख्यमंत्री आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना धम्म आशिर्वाद दिले. यानंतर भंतेजींसाठी भोजनदानाचा सोहळा पार पडला. यावेळी शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, प्रवक्ते राहुल लोंढे, डॉ. राजु वाघमारे, अनिल गायकवाड उपस्थित होते.

ऑल इंडिया भिक्षू महासंघाचे कार्यकारी अध्यक्ष भदंत डॉ. उपगुप्ता महाथेरो म्हणाले की, तथागत भगवान गौतम बुध्दाच्या काळात प्रसेनजित नावाचा राजा होता. तोसुद्धा अशाच प्रकारे भोजनदान, धम्मदान करत होता. त्याची आज आठवण आम्हाला आली, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. “महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा मुख्यमंत्र्याच्या शासकीय निवासस्थानी असा हा भोजनदानाचा कार्यक्रम झाला. याची इतिहासात नोंद होईल”, असे गौरवोद्गार महाथेरो यांनी काढले. ‘वर्षा’वर प्रथमच अशा प्रकारचा सोहळा आयोजित केल्याबद्दल भंतेजींनी आनंद व्यक्त केला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Maharashatra CM : उदंड झाले भावी मुख्यमंत्री; विधानसभेपूर्वीच चर्चा रंगली, पण जनतेच्या मनात कोण व्यक्ती? आजी-माजीच नव्हे तर नवख्यांची पण फौज उभी Maharashatra CM : उदंड झाले भावी मुख्यमंत्री; विधानसभेपूर्वीच चर्चा रंगली, पण जनतेच्या मनात कोण व्यक्ती? आजी-माजीच नव्हे तर नवख्यांची पण फौज उभी
विधानसभा निवडणूक 2024 चे पडघम वाजायला सुरूवात झाली आहे. विविध मुद्दे, आरोप-प्रत्यारोप, गौप्यस्फोटाने राजकारण तापलं आहे. यंदाच्या विधानसभेसाठी पक्षांची संख्या...
जागावाटपाचं सूत्र नेमकं काय ठरलं? काँग्रेस प्रदेशाध्यांकडून महत्त्वाची माहिती, मविआत काय घडतंय?
वर्षा उसगांवकर यांच्याबद्दल ‘या’ अभिनेत्रीने केला हैराण करणारा खुलासा, थेट म्हणाली, मला माहितीच…
सरकार येईल की नाही माहित नाही, पण आठवले पुन्हा मंत्री होतील; गडकरी यांची गॅरंटी
तिरुपती लाडूचा वाद चिघळला, माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून केला आरोप
पंजाबमध्ये आईस फॅक्टरीत गॅस गळती, एकाचा गुदमरून मृत्यू; सहा जणांची सुखरुप सुटका
गणपती विसर्जनादरम्यान भाविकांची बोट समुद्रात उलटली, सुदैवाने जीवितहानी टळली