सरकार खोटी आकडेवारी देतंय; कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीच्या घटनेवरून अखिलेश यादव यांचा भाजपवर निशाणा

सरकार खोटी आकडेवारी देतंय; कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीच्या घटनेवरून अखिलेश यादव यांचा भाजपवर निशाणा

प्रयागराजमध्ये मौनी अमावस्येला मोठी दुर्घटना घडली. शाही स्नानाच्या वेळी चेंगराचेंगरी होऊन अनेक लोकांचा मृत्यू झाला होता. मात्र, याबाबत अद्यापही योगी सरकारने संपूर्ण माहिती दिलेली नाही. तसेच महाकुंभमध्ये स्नानासाठी आलेल्या भाविकांची आकडेवारी स्पष्ट केलेली नाही. यावरून समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी मुख्यमंत्री योगी सरकारवर प्रश्न उपस्थित केले आहेत. सरकार मृतांची संख्या देऊ शकत नाही. पण तिथे आलेल्या भाविकांची संख्या देत नाही, असे म्हणत भाजपवर निशाणा साधला आहे.

लखनौमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना अखिलेश यादव यांनी भाजपला कोंडीत पकडले. भाजपचे लोक महाकुंभात आलेल्या भाविकांची आकडेवारी देखील स्पष्ट सांगत नाहीएत. आमच्या माहितीनुसार, आतापर्यंत 60 कोटी लोकांनी कुंभमेळ्यात स्नान केले आहे. परंतु सरकार जाणूनबुजून योग्य आकडे देत नाहीये जेणेकरून सरकारचा गैरकारभार कळू नये, असे अखिलेश यांनी सांगितले.

एवढेच नाही तर महाकुंभातील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या लोकांचीही अचूक संख्या दिली जात नाही. सरकार डिजिटल कुंभमेळ्याबद्दल बोलत आहे. पण मग योग्य आकडा का देत नाही? जे लोक हरवले आहेत त्यांची देखील माहिती मिळालेली नाही. चॅनल्सवर बातम्या न चालवण्याचा दबाव आणला जात आहे. लोकांना खोया पाया केंद्र मिळत नाहीए. हा सगळा प्रकार याआधी कधीच बघितला नाही. महाकुंभ सोहळ्याचे आयोजन भाजपने केल्याचा आव आणला जात आहे. हे सगळं स्वत: च्या स्वार्थासाठी सुरू आहे, असा हल्लाबोल यावेळी अखिलेश यादव यांनी केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Sanjay Raut : सुरेश धसांवर आतापर्यंतचा मोठा आरोप, काय म्हणाले संजय राऊत, तुम्हाला पण बसेल हादरा Sanjay Raut : सुरेश धसांवर आतापर्यंतचा मोठा आरोप, काय म्हणाले संजय राऊत, तुम्हाला पण बसेल हादरा
खासदास संजय राऊत यांनी भाजपाचे आमदार सुरेश धस यांच्यावर जहरी टीका केली आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात न्यायासाठी...
‘छावा’ सिनेमातील ॲक्शन सीनमधील ‘त्या’ चुका, नसतील आल्या कोणाच्या लक्षात…
PVR थिएटरकडून प्रेक्षकाला लाख रुपयांची भरपाई; कारण वाचून व्हाल थक्क!
महाराष्ट्रात छावा चित्रपट ‘टॅक्स फ्री’ होऊ शकत नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले कारण
पेला है मतलब क्या?; अक्षयने घेतली होती रणवीर अलाहबादियाची चांगलीच फरकी, जुना व्हिडीओ व्हायरल
अंगावर काटा, डोळ्यात पाणी आणणारा ‘छावा’चा तो सीन शूट करणारा दिग्दर्शक कोण? ऐकून अभिमान वाटेल
‘सोनं फक्त तळपतच राहिलं तर..’; संघर्षाबद्दल बोलताना ‘छावा’मधील ‘कवी कलश’चा दाटून आला कंठ