पक्ष बदलायचा असेल तर लोकप्रतिनिधींनी राजीनामा द्यावा आणि निवडणुकीला सामोरं जावं – केरळ उच्च न्यायालय

पक्ष बदलायचा असेल तर लोकप्रतिनिधींनी राजीनामा द्यावा आणि निवडणुकीला सामोरं जावं – केरळ उच्च न्यायालय

जर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना राजकीय पक्ष बदलायचे असतील तर त्यांनी राजीनामा देऊन पुन्हा जनादेशाला (निवडणुकीला) सामोरे जावे, असे निरीक्षण केरळ उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. “निर्वाचित प्रतिनिधीला आपले धोरण किंवा राजकीय संबंध बदलायचे असतील, तर त्याने राजीनामा देऊन पुन्हा जनादेशाला सामोरे जावे. लोकशाहीची ही नैतिक बाजू आहे. अन्यथा, निवडून आलेल्या प्रतिनिधीने लोकांसोबत केलेल्या बाँडमधून एकतर्फी माघार असेल. यातून जनतेच्या इच्छेचा अपमान होईल. पण अशा लोकप्रतिनिधीला जनता पुढच्या निवडणुकीत पाठिंबा देऊन किंवा पराभूत करून आपली इच्छा दाखवू शकते. हेच लोकशाहीचे सौंदर्य आहे”, असे केरळ उच्च न्यायालयाने नमूद केले.

कूथट्टुकुलम नगर सभेच्या महिला नगरसेविकेवरील हल्ला प्रकरणातील पाच आरोपींना जामीन मंजूर करताना न्यायालयाने वरील निरीक्षण नोंदवले. UDF ने आणलेल्या अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने मतदान करण्याच्या निर्णयावर LDF नगरसेविका कला राजू यांचे त्यांच्याच पक्षाच्या सदस्यांनी 18 जानेवारी रोजी अपहरण केले होते. त्या प्रकरणातून सुटण्यासाठी LDF कार्यकर्त्यांच्या सांगण्यावरून UDF ला प्रत्युत्तर म्हणून हल्ल्याचा गुन्हा दाखल केले गेला, असा आरोप आहे.

एलडीएफ आणि यूडीएफ हे दोन्ही लोकशाही पद्धतीने लोकांपर्यंत जाण्याऐवजी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करत आहेत, असे निरीक्षण न्यायमूर्ती पी. व्ही. कुन्हीकृष्णन यांनी नोंदवले. “लोकशाही व्यवस्थेत एखाद्या व्यक्तीचा ज्या पद्धतीने पराभव करायचा आहे ती निवडणूक आहे, शस्त्रे वापरून किंवा तोडफोड करून नाही. या प्रकरणात दोन्ही बाजू लोकशाही पद्धतीने लोकांपर्यंत जाण्याऐवजी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करत आहेत, असे कोर्टाने फटकारले.

नगरा सभा कार्यालयात पोहोचल्यावर तक्रारदार कला राजू यांना मारहाण केली आणि दुखापत केल्याचा आरोप पाच याचिकाकर्त्यांवर आहे. त्यांची साडी खेचून त्यांचा विनयभंग केल्याचाही आरोप याचिकाकर्त्यांवर आहे. कूथट्टुकुलम नगर सभेत आता एका जागेच्या बहुमतासह LDF द्वारे शासित आहे आणि LDF नगरसेवक असलेल्या कला राजू यांनी UDF ने आणलेल्या अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने मतदान करण्याचा निर्णय घेतल्यास LDF ची सत्ता जाईल. त्यामुळेच कला राजू यांचे त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अपहरण केल्याचा आरोप आहे. त्या गुन्ह्यातून सुटण्यासाठी सध्याचा गुन्हा एलडीएफ कार्यकर्त्यांच्या सांगण्यावरून नोंदवला गेल्याचा आरोप आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Sanjay Raut : सुरेश धसांवर आतापर्यंतचा मोठा आरोप, काय म्हणाले संजय राऊत, तुम्हाला पण बसेल हादरा Sanjay Raut : सुरेश धसांवर आतापर्यंतचा मोठा आरोप, काय म्हणाले संजय राऊत, तुम्हाला पण बसेल हादरा
खासदास संजय राऊत यांनी भाजपाचे आमदार सुरेश धस यांच्यावर जहरी टीका केली आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात न्यायासाठी...
‘छावा’ सिनेमातील ॲक्शन सीनमधील ‘त्या’ चुका, नसतील आल्या कोणाच्या लक्षात…
PVR थिएटरकडून प्रेक्षकाला लाख रुपयांची भरपाई; कारण वाचून व्हाल थक्क!
महाराष्ट्रात छावा चित्रपट ‘टॅक्स फ्री’ होऊ शकत नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले कारण
पेला है मतलब क्या?; अक्षयने घेतली होती रणवीर अलाहबादियाची चांगलीच फरकी, जुना व्हिडीओ व्हायरल
अंगावर काटा, डोळ्यात पाणी आणणारा ‘छावा’चा तो सीन शूट करणारा दिग्दर्शक कोण? ऐकून अभिमान वाटेल
‘सोनं फक्त तळपतच राहिलं तर..’; संघर्षाबद्दल बोलताना ‘छावा’मधील ‘कवी कलश’चा दाटून आला कंठ