बॉलिवूडवर आजही आहे अंडरवर्ल्डची दहशत? विवेक ओबेरॉयचं थक्क करणारं उत्तर

बॉलिवूडवर आजही आहे अंडरवर्ल्डची दहशत? विवेक ओबेरॉयचं थक्क करणारं उत्तर

बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय याने अंडरवर्ल्डबद्दल मोठा खुलासा केला आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत विवेक ओबेरॉय याने अंडरवर्ल्डकडून मिळालेल्या धमक्यांबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. शिवाय अंडरवर्ल्ड विरोधात आवाज उचल्याची हिंमत कशी मिळाली यावर देखील अभिनेत्याने मौन सोडलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त विवेक याने केलेल्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

मुलाखतीत विवेकला विचारण्यात आलं की, ‘जेव्हा तुझा वाईट काळ आला तेव्हा नक्की काय झालं होतं? दिग्दर्शक कॉल करत नव्हते की मिळालेले सिनेमे हातातून जात होते?’ यावर विवेक म्हणाला, ‘अनेक गोष्टी घडल्या आहेत. लोकांवर बाहेरून दबाव असायचा की मला सिनेमांमध्ये कास्ट करु नका… बॉलिवूडमध्ये तेव्हा लॉबी प्रकार खूप चालत होता. दिग्दर्शकांवर दबाव असायचा… सतत धमक्या यायच्या… मला देखील अंडरवर्ल्डकडून धमक्या आल्या आहेत.’

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Vivek Oberoi (@vivekoberoi)

 

पुढे विवेक याला ‘आजही बॉलिवूडवर अंडरवर्ल्डची दहशत आहे का?’ असा प्रश्न विचारण्यात आला. यावर अभिनेता म्हणाला, ‘मला असं वाटतं आजच्या मुलांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत नाही. पूर्वी अनेक प्रश्न विचारले जायचे. कोणासोबत काम केलं, कसं काम केलं, का काम केलं… पण आता असं होत नाही. पूर्वी धमक्या यायच्या. मला अनेकदा थेट जीवेमारण्याच्या धमक्या आल्या होत्या.’ असं देखील अभिनेता म्हणाला.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Vivek Oberoi (@vivekoberoi)

 

अंडरवर्ल्ड विरोधात उभं राहण्याचा निर्णय कधी घेतला? असा प्रश्न देखील विवेक याला विचारण्यात आला. ‘मी माझ्या आईला रडताना पाहिलं आहे. तिला पाहिल्यानंतर मला देखील रडू आवरलं नाही. तिनेच माझी समज घातली. रडत बसलास तर काहीही होणार नाही. आई मला कॅन्सरच्या रुग्णालयात घेवून गेली. तव्हा मला कळलं की दुसऱ्याच्या अडचणींसमोर आपला अचडणी फार कमी आहे…’ असं देखील विवेक म्हणाला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आदिवासी आमदारांच्या आंदोलनानंतर सरकारकडून पेसा भरतीवर तोडगा, आता अशी भरती होणार आदिवासी आमदारांच्या आंदोलनानंतर सरकारकडून पेसा भरतीवर तोडगा, आता अशी भरती होणार
आदिवासी समाजातील आमदारांनी शुक्रवारी धक्कादायक निर्णय घेतला. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, आमदार हिरामण खोसकर, हेमंत सावरा यांच्यासह काही जणांनी धनगरांचा...
प्रियांका चोप्रा हिचा ‘तो’ अत्यंत मोठा खुलासा, म्हणाली, मी आयुष्यात..
श्वेता तिवारी दुसऱ्याचा संसार उद्ध्वस्त करणारी महिला…, खासदाराच्या पहिल्या पत्नीचे अभिनेत्रीवर गंभीर आरोप
बदाम या पद्धतीने खाल्ले तर ठरेल विष, सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी म्हटले दारुपेक्षा धोकादायक ठरले असे खाणे
Ratnagiri News – रिळ-उंडी MIDC रद्द करा अन्यथा विधानसभेला मतदानावर बहिष्कार; गावकऱ्यांचा महायुती सरकारला इशारा
अरविंद केजरीवाल यांनी सोडले मुख्यमंत्री आवास, कर्मचाऱ्यांना मिठी मारून दिला निरोप
योजनांसाठी महिन्याला 3 हजार कोटी रुपयांचं कर्ज? महाराष्ट्राच्या तिजोरीत खडखडाट