महाराष्ट्रातील निवडणुकीनंतर केंद्रातील मोदी सरकार कोसळणार; पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा

महाराष्ट्रातील निवडणुकीनंतर केंद्रातील मोदी सरकार कोसळणार; पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने राज्यात प्रत्येक पक्षाने तयारीही सुरू केली आहे. राज्यातील सध्याचे वातावरण पाहता सत्ताबदल अटळ असल्याचा दावा काँग्रेसचे वरिष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. महाराष्ट्रात आणि हरयाणात काँग्रेसची सत्ता येणार आहे. त्यामुळे या दोन राज्यातील निवडणुकीनंतर केंद्रातील नरेंद्र मोदी यांचे सरकार कोसळेल, असा दावाही त्यांनी केला आहे. महाराष्ट्रात आणि हरयाणात सत्तांतर झाल्यानंतर चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार केंद्र सरकारचा पाठींबा काढून घेतील, असेही चव्हाण यांनी म्हटले आहे.

जनतेचा निर्धार पाहता महाराष्ट्रात महाविकास आघाडीला बहुमत मिळणार आहे. महाराष्ट्रासह हरियाणातही सत्तांतर होणार आहे. त्यामुळे या दोन राज्यातील निवडणुकानंतर केंद्रातील मोदी सरकार फार काळ टिकणार नाही. या दोन राज्यातील निवडणुकांच्या भीतीमुळे मोदी सरकारची खुर्ची डळमळीत झाली आहे, असा दावाही पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

आगामी काळात अनेकजणांचा काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे. भाजपचा खरा चेहरा समजलेले नेते आता त्यांच्यासोबत राहणार नाहीत. सत्तेत असलेले भ्रष्ट सरकार उलथवून टाकण्यासाठी, महागाईवर नियंत्रण मिळवण्याकरता, बेरोजगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी जनतेचा कौल महाविकास आघाडीला असल्याचे दिसून येत आहे. राज्यातील सध्याची परिस्थिती पाहाता राज्यात महाविकास आघाडीला चांगल्या जागा मिळातील, असा दावाही त्यांनी केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बांगलादेशी बन्ना शेख मुंबईत येऊन बनली रिया बर्डे, अडल्ट चित्रपटात काम… पोर्न स्टारने पूर्ण परिवाराचा आधार कार्ड, पासपोर्ट अन् वोटर आयडीही बनवला बांगलादेशी बन्ना शेख मुंबईत येऊन बनली रिया बर्डे, अडल्ट चित्रपटात काम… पोर्न स्टारने पूर्ण परिवाराचा आधार कार्ड, पासपोर्ट अन् वोटर आयडीही बनवला
मुंबईतील ठाण्यात रिया बर्डे उर्फ बन्ना शेख हिला अटक करण्यात आली. बांगलादेशी ही मॉडेल संपूर्ण परिवारासोबत घुसखोरी करुन पश्चिम बंगालमध्ये...
सिनेटचा विजय ही तर सुरुवात, विधानसभेला…; आदित्य ठाकरे काय म्हणाले?
Senate Election : हा दस का दम… आदित्य ठाकरे यांनी विजयी होताच भरला हुंकार
‘धर्मवीर’ सिनेमावर वाद, सुषमा अंधारे यांचं ट्विट, प्रवीण तरडे म्हणाले, ‘दिघे साहेबांच्या, बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट…’
अखेर ऐश्वर्या राय हिने केला मोठा खुलासा, थेट म्हणाली, माझी मुलगी…
लता मंगेशकर यांची ‘प्रेम कहाणी’ का राहिली अधुरी? त्यांच्यावर झालेला विष प्रयोग आणि बरंच काही…
ऐश्वर्या राय हिने लेकीसाठी केले ‘हे’ काम, आराध्या बच्चन आणि अभिनेत्री…